शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वान धरणातील जलसाठा तीन दिवसात १२ टक्क्यांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:29 IST

वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात बुधवार पर्यंत ३६.८४ जल साठा जमा झाला आहे.

- अझहर अलीसंग्रामपुर : अकोला, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर बांधलेले हनुमान सागर धरणाच्या जलसाठ्यात तीन दिवसापासुन  वाढ होत आहे. पावसाळा सुरू झाला तेव्हा पासुन धरणाच्या जलसाठ्यात वाढ होताना दिसत नव्हती. चार दिवस अगोदर या धरणात २५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यात आता झपाट्याने वाढ होताना दिसत असुन, तीन दिवसामध्ये १२ टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ झाली. धरणामध्ये पाण्याची आवक वाढतीवर आहे. गत पाच दिवसापासुन पावसाच्या चांगल्याच सरी कोसळत असुन धरण परीसरातही वरूणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या जल साठ्यात वाढ होत आहे. वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात बुधवार पर्यंत ३६.८४ जल साठा जमा झाला आहे. या धरणातुन अकोला जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर व खारपान पट्टयातील संग्रामपुर व जळगाव जा. तालुक्यातील १४० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. वान नदी पात्रावर उभारण्यात आलेले हे धरण शेकडो गावातील लाखो लोकांची तहान भागवत आहे. यावर विज निर्मिती संच उभारण्यात आला असुन त्या संचाची क्षमता १ हजार ५०० किलो मेगावँट आहे. येथे एक हजार किलो मेगावँट विज निर्मिती करण्यात येत असुन अकोला जिल्ह्यातील हिवरखेड उप केंद्राला विज पुरवठा करण्यात येतो. तसेच अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला या धरणातुन पाठाच्या माध्यमातुन पाणी मिळते. त्यामुळे वारी हनुमान येथील धरण या भागातील जनतेसाठी जिवनदायी ठरत आहे. धरणामधील जलसाठ्यात वाढ होत असल्याने या भागात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणि उपलब्ध होणार आहे. सातपुडा पर्वत रांगेतुन वाहत येत असलेली वान नदीचा उगम मध्यप्रदेशातुन असल्याने पर प्रांतात पाऊस पडल्यास या नदीला मोठ्या प्रमाणात पाणि येते सद्यास्थिती मध्यप्रदेशासह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने हनुमान सागर धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. धरण परीसरात अशाच प्रकारे पाऊस पडला तर वारी येथील धरण लवकर भरण्याची शक्यता आहे. या धरणात सोमवार पासुन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असुन बुधवारी सकाळ पर्यंत धरणामध्ये ३६.८४ टक्के जलसाठा जमा झाला असल्याची माहीती वान प्रकल्पाकडुन प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पbuldhanaबुलडाणाAkolaअकोलाSangrampurसंग्रामपूर