शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पाणीटंचाई: विकतच्या पाण्यावर भागवावी लागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 14:15 IST

दररोज २० ते २५ रुपये मोजून खाजगी पाणी फिल्टर प्लांट धारकांकडून कॅन विकत घेऊन आपली तहान भागवतात.

बिबी:  बिबी येथे पाणीपुरवठा होणाºया जलाशयात पुरेसा जलसाठा असून सुद्धा योग्य नियोजन नसल्यामुळे बीबी वासियांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वापरासाठी टँकरद्वारे पाणी विकत घेतात. दररोज २० ते २५ रुपये मोजून खाजगी पाणी फिल्टर प्लांट धारकांकडून कॅन विकत घेऊन आपली तहान भागवतात.गावात मोलमजुरी करणाºयांची संख्या जास्त आहे. त्यांना दररोज एवढे पैसे मोजून पाणी घेणे परवडत नाही. ते सर्वजण गावच्या पुर्वेस असणाºया मशानभूमी जवळील हातपंपाच्या पाण्याने आपली गरज भागवतात. परंतु तो हातपंप चार पाच दिवसापासून नादुरूस्त आहे. त्यामुळे गावकºयांना पाणीच मिळेनासे झाले आहे. नळाद्वारे गावाला पाणी पुरवठा होतो, तो २० दिवसाआड तर कधी एक-एक महिन्याच्या अंतराने. पाणी पुरवठा करणाºया विहिरीला गावकºयांना पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध आहे; परंतु नियोजना अभावी पाणी समस्या भेडसावत आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे पाणी रात्री-बेरात्रीच्या वेळेस सोडल्या जाते. विहिरीतील पाणी गावात बांधलेल्या पाण्याच्या टाकीत न सोडता थेट विहिरीतून नळाला सोडले जाते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या शोभेच्या वस्तू बनलेल्या आहेत. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव कारणीभूत असून लोकांना नहाक त्रास सहन करावा लागत आहे.  आरोग्य धोक्यात फिल्टर प्लांटच्या टाकाऊ पाण्याचा वापरही काही गोरगरीब मजूर करीत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांना स्वच्छ व मुबलक पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा गोरगरीब जनते कडून केली जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला  निवेदन दिले आहे. या निवेदनावर गणेश आटोळे, लक्ष्मण लोहारे, सोहेल खान, योगेश लोंढे, संतोष गाढवे, वैभव महाजन, आकाश जाधव, प्रकाश वाकळे व राहुल वानखेडे यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई