शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पाणीटंचाई: विकतच्या पाण्यावर भागवावी लागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 14:15 IST

दररोज २० ते २५ रुपये मोजून खाजगी पाणी फिल्टर प्लांट धारकांकडून कॅन विकत घेऊन आपली तहान भागवतात.

बिबी:  बिबी येथे पाणीपुरवठा होणाºया जलाशयात पुरेसा जलसाठा असून सुद्धा योग्य नियोजन नसल्यामुळे बीबी वासियांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वापरासाठी टँकरद्वारे पाणी विकत घेतात. दररोज २० ते २५ रुपये मोजून खाजगी पाणी फिल्टर प्लांट धारकांकडून कॅन विकत घेऊन आपली तहान भागवतात.गावात मोलमजुरी करणाºयांची संख्या जास्त आहे. त्यांना दररोज एवढे पैसे मोजून पाणी घेणे परवडत नाही. ते सर्वजण गावच्या पुर्वेस असणाºया मशानभूमी जवळील हातपंपाच्या पाण्याने आपली गरज भागवतात. परंतु तो हातपंप चार पाच दिवसापासून नादुरूस्त आहे. त्यामुळे गावकºयांना पाणीच मिळेनासे झाले आहे. नळाद्वारे गावाला पाणी पुरवठा होतो, तो २० दिवसाआड तर कधी एक-एक महिन्याच्या अंतराने. पाणी पुरवठा करणाºया विहिरीला गावकºयांना पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध आहे; परंतु नियोजना अभावी पाणी समस्या भेडसावत आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे पाणी रात्री-बेरात्रीच्या वेळेस सोडल्या जाते. विहिरीतील पाणी गावात बांधलेल्या पाण्याच्या टाकीत न सोडता थेट विहिरीतून नळाला सोडले जाते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या शोभेच्या वस्तू बनलेल्या आहेत. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव कारणीभूत असून लोकांना नहाक त्रास सहन करावा लागत आहे.  आरोग्य धोक्यात फिल्टर प्लांटच्या टाकाऊ पाण्याचा वापरही काही गोरगरीब मजूर करीत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांना स्वच्छ व मुबलक पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा गोरगरीब जनते कडून केली जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला  निवेदन दिले आहे. या निवेदनावर गणेश आटोळे, लक्ष्मण लोहारे, सोहेल खान, योगेश लोंढे, संतोष गाढवे, वैभव महाजन, आकाश जाधव, प्रकाश वाकळे व राहुल वानखेडे यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई