शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

वनक्षेत्रातील ८0 गावक्षेत्रात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 23:50 IST

वन विभागाकडून अपु-या उपाययोजना; पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटंकती.

बुलडाणा : जिल्ह्याला मोठय़ा प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून, सध्या जिल्ह्यातील सातही वन परिक्षेत्रातील जवळपास ८0 बिटमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर वन विभागाकडून उपाययोजना होत असल्या, तरी त्या तत्पुरत्या आहेत. यामुळे वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नोव्हेंबर २0१६ नंतर पाऊस न पडल्यामुळे सध्या जिल्ह्यातील जलस्तर खालावलेला आहे. या जलसंकटाचा फटका जिल्ह्यातील वनक्षेत्राला बसत आहे. यामुळे वन्य जीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परिणामी ते गावाकडे कूच करतात आणि मानव-वन्यजीव संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाकडून सात वन परिक्षेत्रात उपाययोजना सुरू आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठय़ांमधील पाणी आटल्याने कृत्रिम पाणवठय़ांना पुनरुज्जीवित करण्याचं काम होत आहे. ८१ नवीन कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येत आहेत. या कृत्रिम पाणवठय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे वनक्षेत्रातील वन्य प्राण्यांनाही तहान भागविण्यासाठी टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.