शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चिखली तालुक्यातील ८० गावात आतापासूनच पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:06 IST

- सुधीर चेके पाटील चिखली : तालुक्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने एकूण १४३ गावांपैकी तब्बल ८० गावांमध्ये ...

- सुधीर चेके पाटील

चिखली : तालुक्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने एकूण १४३ गावांपैकी तब्बल ८० गावांमध्ये आतापासूनच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. त्यात यंदा सर्वच जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडत असल्याने येणाºया काळात गावांच्या संख्येत वाढ होवून तालुक्याला प्रथमच अत्यंत तीव्रतेच्या पाणीटंचाईचा सामना करावा लाागणार आहे. यानुषंगाने व संभाव्य पाणी टंचाईचा नियोजनपूर्वक सामना करण्यासाठी तालुका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अश्या तीन टप्प्यांमध्ये टंचाई निवारणार्थ उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात केवळ ६२ टक्के पर्जन्यमान झाल्याने तालुक्यातील पाणीपुरवठ्याचे मुख्य स्त्रोत कोरडेच राहीले आहेत. तथापी भूगर्भातील पाणीपतळी देखील कमालीची खालावली आहे. कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सर्वच जलाशयातील पाणी यंदा केवळ पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत असून खरीपा पाठोपाठ रब्बी हंगाम देखील धोक्यात आला आहे. तालुक्यातील प्रमुख जलाशयांपैकी पेनटाकाळी प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा आहे. तर खडकपूर्णा प्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक असून जिवंत साठा शून्य आहे. याशिवाय ब्राम्हणवाडा, पाटोदा, अंचरवाडी, मिसाळवाडी या मध्यम प्रकल्पासंह इतर लहान प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा यंदा झालेला नाही. या प्रकल्पातील हा अत्यल्प पाणीसाठा आणि सद्यस्थितीतच तालुक्यातील तब्बल ८० गावांमध्ये असलेली पाणीटंचाईची आजची ही स्थिती आहे. यावरून येणार्या काळातील बिकट स्थितीचा अंदाज यावा. (तालुका प्रतिनिधी)

टंचाई निवारणार्थ ८० गावात १८२ योजना

तालुक्याला आतापासून भेडसावणाºया पाणीटंचाई निवाराणार्थ तालुका प्रशासना कृती आराखड्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर २०१८ च्या पहिल्या टप्प्यात तब्बल ८० गावांचा समावेश असून या गावातील पाणीटंचाई निवारनार्थ १८२ योजना उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ च्या दुसºया टप्प्यात ७८ गावांचा समावेश आहे तर एप्रिल ते जून २०१९ च्या तीसºया टप्प्यात २० गावांचा समावेश आहे.

१२३ विहिरींचे होणार अधिग्रहण

८० गावातील पाणीटंचाई निवारणार्थ पहिल्या टप्प्यात २४ विहिरींचे खोलीकरण करणे, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण, २८ गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा, ७ गावातील नळयोजनेची विशेष दुरूस्ती, १ विंधन विहीरीची विशेष दुरूस्ती, ३१ विंधन विहिर/ कुपनलिका घेणे आणि १६ ठिकाणी तात्पुरती पूरक नळयोजना प्रस्तवित करण्यात आली आहे. तर दुसºया टप्प्यात ११ विहींरींचे खोलीकरण, ४३ विहींरींचे अधिग्रहण, १८ गावात टँकर, २ ठिकाणची नळयोजना पूर्ण करणे, ३ नळयोजना दुरूस्ती, २३ बोअर घेणे व ४ तात्पुरती पूरक नळयोजना आणि तिसºया टप्प्यात ८ विहींरींचे खोलीकरण, ५ विहींरींचे अधिग्रहण, १३ गावात टँकर, ४ बोअर घेणे व ३ तात्पुरती पूरक नळयोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यानुसार यंदा १२३ विहिरींचे अधिग्रहण तर ५९ टँकरव्दारे पाणीपुरवठा होणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखली