शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चिखली तालुक्यातील ८० गावात आतापासूनच पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:06 IST

- सुधीर चेके पाटील चिखली : तालुक्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने एकूण १४३ गावांपैकी तब्बल ८० गावांमध्ये ...

- सुधीर चेके पाटील

चिखली : तालुक्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने एकूण १४३ गावांपैकी तब्बल ८० गावांमध्ये आतापासूनच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. त्यात यंदा सर्वच जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडत असल्याने येणाºया काळात गावांच्या संख्येत वाढ होवून तालुक्याला प्रथमच अत्यंत तीव्रतेच्या पाणीटंचाईचा सामना करावा लाागणार आहे. यानुषंगाने व संभाव्य पाणी टंचाईचा नियोजनपूर्वक सामना करण्यासाठी तालुका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अश्या तीन टप्प्यांमध्ये टंचाई निवारणार्थ उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात केवळ ६२ टक्के पर्जन्यमान झाल्याने तालुक्यातील पाणीपुरवठ्याचे मुख्य स्त्रोत कोरडेच राहीले आहेत. तथापी भूगर्भातील पाणीपतळी देखील कमालीची खालावली आहे. कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सर्वच जलाशयातील पाणी यंदा केवळ पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत असून खरीपा पाठोपाठ रब्बी हंगाम देखील धोक्यात आला आहे. तालुक्यातील प्रमुख जलाशयांपैकी पेनटाकाळी प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा आहे. तर खडकपूर्णा प्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक असून जिवंत साठा शून्य आहे. याशिवाय ब्राम्हणवाडा, पाटोदा, अंचरवाडी, मिसाळवाडी या मध्यम प्रकल्पासंह इतर लहान प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा यंदा झालेला नाही. या प्रकल्पातील हा अत्यल्प पाणीसाठा आणि सद्यस्थितीतच तालुक्यातील तब्बल ८० गावांमध्ये असलेली पाणीटंचाईची आजची ही स्थिती आहे. यावरून येणार्या काळातील बिकट स्थितीचा अंदाज यावा. (तालुका प्रतिनिधी)

टंचाई निवारणार्थ ८० गावात १८२ योजना

तालुक्याला आतापासून भेडसावणाºया पाणीटंचाई निवाराणार्थ तालुका प्रशासना कृती आराखड्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर २०१८ च्या पहिल्या टप्प्यात तब्बल ८० गावांचा समावेश असून या गावातील पाणीटंचाई निवारनार्थ १८२ योजना उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ च्या दुसºया टप्प्यात ७८ गावांचा समावेश आहे तर एप्रिल ते जून २०१९ च्या तीसºया टप्प्यात २० गावांचा समावेश आहे.

१२३ विहिरींचे होणार अधिग्रहण

८० गावातील पाणीटंचाई निवारणार्थ पहिल्या टप्प्यात २४ विहिरींचे खोलीकरण करणे, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण, २८ गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा, ७ गावातील नळयोजनेची विशेष दुरूस्ती, १ विंधन विहीरीची विशेष दुरूस्ती, ३१ विंधन विहिर/ कुपनलिका घेणे आणि १६ ठिकाणी तात्पुरती पूरक नळयोजना प्रस्तवित करण्यात आली आहे. तर दुसºया टप्प्यात ११ विहींरींचे खोलीकरण, ४३ विहींरींचे अधिग्रहण, १८ गावात टँकर, २ ठिकाणची नळयोजना पूर्ण करणे, ३ नळयोजना दुरूस्ती, २३ बोअर घेणे व ४ तात्पुरती पूरक नळयोजना आणि तिसºया टप्प्यात ८ विहींरींचे खोलीकरण, ५ विहींरींचे अधिग्रहण, १३ गावात टँकर, ४ बोअर घेणे व ३ तात्पुरती पूरक नळयोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यानुसार यंदा १२३ विहिरींचे अधिग्रहण तर ५९ टँकरव्दारे पाणीपुरवठा होणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखली