शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

पाण्यासाठी फेब्रुवारीपासूनच टँकरचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:41 IST

गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुंदरखेड येथील नागरिकांना आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असून या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.बुलडाणा शहर व परिसरातील काही गावांसह सुंदरखेड गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणामध्ये पुरेसा जलसाठा आहे. मात्र तरीदेखील नागरिकांना नेहमीच विलंबाने पाणीपुरवठा केल्या जातो. हिवाळा असो की पावसाळा १५ दिवसाच्या आधी कधीच पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्यात तर २० ते २५ दिवसांवर तर कधी चक्क महिनाभराने पाणीपुरवठा होते. यामुळे उन्हाळाभर नागरिकांना टँकर विकत घ्यावे लागते. सध्या गेल्या २० ते २५ दिवसांपासून नळाद्वारे पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे नियमितपणे ग्रामपंचायतीचे सर्व कर चुविणाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी संबंधित कर्मचाºयास विचारणा केल्यास नेहमीच पाइप फुटला असल्याचे कारण समोर करण्यात येते. मुळात ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजनच करण्यात येत नाही. शहराला लागून असल्याने गावाची लोकसंख्या खूप मोठी आहे. एवढ्या मोठ्या लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी विभागनिहाय दिवस ठरवून योग्य त्या वेळी पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. नियमित कर भरूनही ग्रामपंचायतीकडून आवश्यक असलेल्या इतर सुविधादेखील मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार होतात. काही भागातील पथदिवे सतत बंद असून काही ठिकाणी रस्त्यांचीदेखील खस्ता हालत झाली आहे. या सर्व समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज सध्याच्या परिस्थितीत निर्माण झाली आहे.यासंदर्भात सरपंच अपर्णा चव्हाण यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई