शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

पाण्यासाठी फेब्रुवारीपासूनच टँकरचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:41 IST

गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुंदरखेड येथील नागरिकांना आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असून या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.बुलडाणा शहर व परिसरातील काही गावांसह सुंदरखेड गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणामध्ये पुरेसा जलसाठा आहे. मात्र तरीदेखील नागरिकांना नेहमीच विलंबाने पाणीपुरवठा केल्या जातो. हिवाळा असो की पावसाळा १५ दिवसाच्या आधी कधीच पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्यात तर २० ते २५ दिवसांवर तर कधी चक्क महिनाभराने पाणीपुरवठा होते. यामुळे उन्हाळाभर नागरिकांना टँकर विकत घ्यावे लागते. सध्या गेल्या २० ते २५ दिवसांपासून नळाद्वारे पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे नियमितपणे ग्रामपंचायतीचे सर्व कर चुविणाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी संबंधित कर्मचाºयास विचारणा केल्यास नेहमीच पाइप फुटला असल्याचे कारण समोर करण्यात येते. मुळात ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजनच करण्यात येत नाही. शहराला लागून असल्याने गावाची लोकसंख्या खूप मोठी आहे. एवढ्या मोठ्या लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी विभागनिहाय दिवस ठरवून योग्य त्या वेळी पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. नियमित कर भरूनही ग्रामपंचायतीकडून आवश्यक असलेल्या इतर सुविधादेखील मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार होतात. काही भागातील पथदिवे सतत बंद असून काही ठिकाणी रस्त्यांचीदेखील खस्ता हालत झाली आहे. या सर्व समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज सध्याच्या परिस्थितीत निर्माण झाली आहे.यासंदर्भात सरपंच अपर्णा चव्हाण यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई