शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाण्यासाठी फेब्रुवारीपासूनच टँकरचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:41 IST

गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुंदरखेड येथील नागरिकांना आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असून या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.बुलडाणा शहर व परिसरातील काही गावांसह सुंदरखेड गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणामध्ये पुरेसा जलसाठा आहे. मात्र तरीदेखील नागरिकांना नेहमीच विलंबाने पाणीपुरवठा केल्या जातो. हिवाळा असो की पावसाळा १५ दिवसाच्या आधी कधीच पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्यात तर २० ते २५ दिवसांवर तर कधी चक्क महिनाभराने पाणीपुरवठा होते. यामुळे उन्हाळाभर नागरिकांना टँकर विकत घ्यावे लागते. सध्या गेल्या २० ते २५ दिवसांपासून नळाद्वारे पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे नियमितपणे ग्रामपंचायतीचे सर्व कर चुविणाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी संबंधित कर्मचाºयास विचारणा केल्यास नेहमीच पाइप फुटला असल्याचे कारण समोर करण्यात येते. मुळात ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजनच करण्यात येत नाही. शहराला लागून असल्याने गावाची लोकसंख्या खूप मोठी आहे. एवढ्या मोठ्या लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी विभागनिहाय दिवस ठरवून योग्य त्या वेळी पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. नियमित कर भरूनही ग्रामपंचायतीकडून आवश्यक असलेल्या इतर सुविधादेखील मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार होतात. काही भागातील पथदिवे सतत बंद असून काही ठिकाणी रस्त्यांचीदेखील खस्ता हालत झाली आहे. या सर्व समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज सध्याच्या परिस्थितीत निर्माण झाली आहे.यासंदर्भात सरपंच अपर्णा चव्हाण यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई