शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईची चाहूल;  विहीर अधिग्रहणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:39 IST

Water scarcity in Buldana district नांदुरा व शेगाव तालुक्यातील पाच गावांत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवण्यास प्रारंभ झाला असून, नांदुरा व शेगाव तालुक्यातील पाच गावांत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या वर्षीचा जिल्ह्याचा पाणीटंचाईचा कृती आराखडा हा १६ कोटी ३ लाख ३२ हजार रुपयांचा आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यातील ६८७ गावांत पाणीटंचाई जाणवण्याची भीती आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने ९५६ उपाययोजनांची तरतूद जिल्हा प्रशासनाने केली आहे. यामध्ये विंधन विहिरी, कूपनलिका घेण्यासाठी १ कोटी २६ लाख ५० हजार रुपयांची आराखड्यात तरतूद करण्यात आली असून २३० उपाययोजना त्यातून करण्यात येणार आहेत. ६१ नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तात्पुरत्या पूरक नळ योजनांसाठी दोन कोटी १० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, २१ गावांतील योजनांची दुरुस्ती करावी लागणार आहे.याव्यतिरिक्त ५३८ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ५५९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. त्यासाठी २ कोटी ७५ लाख ८२ हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.

दोन तालुक्यांत आतापासूनच टंचाईखारपाण पट्ट्यातील दोन तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास प्रारंभ झाला असून, नांदुरा तालुक्यात त्यामुळे नारखेड, हिंगणा भोटा, भोरवंड आणि शेगाव तालुक्यात चिंचखेड आणि जानोरी येथे त्यामुळे विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत.

८२ गावांत टँकरची गरजयावर्षी ६८७ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, ८२ गावांना ८४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. त्यादृष्टीने ६ कोटी ८४ लाख रुपयांचे पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात नियोजन करण्यात आले आहे. तूर्तास जिल्ह्यात एकही पाण्याचे टँकर सुरू नसल्याचे टंचाई निवारण विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, २०१८-२०१९ या वर्षी जिल्ह्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई होती. त्या तुलनेत यंदा टंचाईचे प्रमाण कमी असल्याचे जाणवत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई