शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

जिल्ह्यातील ६६ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:34 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील एप्रिल महिन्याच्या मध्यावर पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून ६६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच ५७ ...

बुलडाणा : जिल्ह्यातील एप्रिल महिन्याच्या मध्यावर पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून ६६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच ५७ गावांची तहान ही विहीर अधिग्रहीत करून भागविण्यात येत आहे.

यावर्षी तुलनेने पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे डिसेंबरअखेर जिल्ह्यात फारशी पाणीटंचाई जाणवली नव्हती. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात टंचाईची दाहकात वाढत असून त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारण विभागाने उपाययोजनांवर भर दिला आहे. त्याअंतर्गत उपरोक्त गावांना टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात ६८७ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता यंत्रणेने व्यक्त केली आहे. त्यासाठी ९५६ विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यासाठी १६ कोटी रुपयांचा टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला पिंपरखेड, ढासाळवाडी, हनवतखेड, सावळा (ता. बुलडाणा), असोला तांडा, सैलानीनगर, कोलारा (चिखली), सावरगाव माळ (सिंदखेडराजा) आणि चिंचखेडनाथ इसालवाडी (ता. मोताळा) या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. थोडक्यात जिल्ह्यातील जवळपास २० हजार लोकसंख्या ही टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.

--५२ लाख ८५ हजारांचा खर्च--

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी आतापर्यंत ५० लाख रुपयांचा खर्च झाला असून ५७ गावांची तहान ६० विहिरी अधिग्रहीत करून भागविण्यात येत आहे. त्यावर आतापर्यंत २० लाख ६३ हजार रुपयांचा खर्च झाला आहे, तर नऊ गावांतील पाण्याच्या टँकरवर ३२ लाख २२ हजार रुपये खर्च झाला आहे. दरम्यान, येत्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणखी काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारण विभाग नियोजन करत आहे.