शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जिल्ह्यातील ६६ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:34 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील एप्रिल महिन्याच्या मध्यावर पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून ६६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच ५७ ...

बुलडाणा : जिल्ह्यातील एप्रिल महिन्याच्या मध्यावर पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून ६६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच ५७ गावांची तहान ही विहीर अधिग्रहीत करून भागविण्यात येत आहे.

यावर्षी तुलनेने पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे डिसेंबरअखेर जिल्ह्यात फारशी पाणीटंचाई जाणवली नव्हती. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात टंचाईची दाहकात वाढत असून त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारण विभागाने उपाययोजनांवर भर दिला आहे. त्याअंतर्गत उपरोक्त गावांना टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात ६८७ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता यंत्रणेने व्यक्त केली आहे. त्यासाठी ९५६ विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यासाठी १६ कोटी रुपयांचा टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला पिंपरखेड, ढासाळवाडी, हनवतखेड, सावळा (ता. बुलडाणा), असोला तांडा, सैलानीनगर, कोलारा (चिखली), सावरगाव माळ (सिंदखेडराजा) आणि चिंचखेडनाथ इसालवाडी (ता. मोताळा) या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. थोडक्यात जिल्ह्यातील जवळपास २० हजार लोकसंख्या ही टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.

--५२ लाख ८५ हजारांचा खर्च--

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी आतापर्यंत ५० लाख रुपयांचा खर्च झाला असून ५७ गावांची तहान ६० विहिरी अधिग्रहीत करून भागविण्यात येत आहे. त्यावर आतापर्यंत २० लाख ६३ हजार रुपयांचा खर्च झाला आहे, तर नऊ गावांतील पाण्याच्या टँकरवर ३२ लाख २२ हजार रुपये खर्च झाला आहे. दरम्यान, येत्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणखी काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारण विभाग नियोजन करत आहे.