शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

बुलडाणा जिल्ह्यातील ६५ गावातील पाणीनमुने दुषीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 12:49 IST

४२ टक्के उद्भवामध्ये नायट्रेटसह आर्यन व अन्य मुलद्रव्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील सुमारे सात हजार पाणी उद्भवापैकी निम्म्या उद्भवातील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४२ टक्के उद्भवामध्ये नायट्रेटसह आर्यन व अन्य मुलद्रव्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आढळून आले आहे. त्यातच ६५ गावातील पाणी नमुने हे दुषीत आढळून आले आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सहकार्याने भुजल सर्व्हेक्षण विभागाने जिल्ह्यातील सहा हजार ८४१ पाण्याच्या उद्भवापैकी तीन हजार ४४३ उद्भवातील पाण्याचे नमुने गोळा केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ३, ६१० पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी भुजल सर्व्हेक्षण विभागाने केली तेव्हा यापैकी १,४५३ अर्थात ४२ टक्के पाणी नमुने पिण्याच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. विशेष म्हणजे या पाण्यात आयर्न व नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. घातक फ्लोराईडचे प्रमाण मात्र या पाण्यात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रामुख्याने पाण्याची अनुजैविक आणि रासायनिक तपासणी दरवर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात करण्यात येत असते. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात नागरिक ज्या पाणी उद्भवातून पाणी दैनंदिन गरजांसाठी वापरतात तेथील पाण्याचे नमुने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकलीत केले होते. भुजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून त्यांची तपासणी करण्यात आली असता त्यात ४२ टक्के पाणी नमुने हे अनफीट अर्थात पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले होते.

या तालुक्यात आयर्न, नायट्रेटचे प्रमाण अधिकजळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्यातील १७४ आणि १७७, चिखली तालुक्यातील २०० तर बुलडाणा तालुक्यातील १२९ ठिकाणच्या पाणी नमुन्यामध्ये नायट्रेटसह आयर्नचे तथा अन्य मुलद्रव्याचे प्रमाण हे निर्धारीत निकषापेक्षा अधिक आढळून आले आहे. त्यामुळे एकूण तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांपैकी ४२ टक्के पाणी नमुने हे पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी आता ग्रामीण भागातील या पाण्याच्या उद्भवांचे शुद्धीकरण करणे गरजेचे झाले आहे.नऊ टक्के ग्रामपंचायतीमधील पाणी दुषीतआरोग्य विभागाच्या माध्यमातूनही तपासण्यास आलेल्या पाणी नमुन्यांची शहानिशा करण्यात आली असता नऊ टक्के ग्रामपंचायतीमधील पाणी हे दुषीत आढळून आले आहे. यात प्रामुख्याने एकट्या मोताळा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश असून बुलडाणा तालुक्यातील आठ, मेहकर आणि नांदुरा तालुक्यातील सात गावांचा यात समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी