शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: July 13, 2014 21:37 IST

पावसाचा फटका: विद्यार्थी संख्या १ लाख ९२ हजार

धाड : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण १ हजार ४४८ शाळा असून जवळपास १ लाख ९२ हजारांवर विद्यार्थी संख्या आहे. या पैकी अनेक शाळांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गत दशकात यावर्षी प्रथमच जुलै महिना कोरडा जात आहे. जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस नाही. हवेतील आद्र्रता कमी तर उन्हाची तिव्रता अधिक असल्याने उन्हाळ्यापेक्षाही जास्त चटके बसत आहेत. शाळेत बसविण्यात आलेले पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप कोरडे पडले आहेत. घरुन पाण्याने भरुन आणलेल्या बॉटल शाळेत येईपर्यंतच गरम झाल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उन्हाळ्यापासून कोरड्या आहेत. काही जि.प.शाळेत असणार्‍या हातपंपाना पाणी असले तरी त्याची पातळी खोल गेल्याने मुलांची झुंबड उडते. अशीच अवस्था माध्यमिक शाळांची असून पाणी आणावे कुठून हा प्रश्न मुख्याध्यापकासमोर उभा आहे.** पोषण आहार योजनेलाही फटकाप्रत्येक शाळेत असलेली पोषण आहार योजनेलाही पाण्याचा फटका बसला आहे. हा आहार शिजवण्याएवढा पाणीसाठा उपलब्ध करुण्याची कसरत मुख्याध्यापकांना करावी लागत आहे.** दरवर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा पाऊस महिना उलटला तरी यावर्षी पडेना. टिनपत्राच्या खोलीतील शिक्षण लहान मुलांना त्रास देणारे ठरत असून पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने पाऊस पडेपर्यंत सकाळच्या सत्रातील शाळा सुरू कराव्यात. - पंजाब टेकाळे, मुख्याध्यापक, मपुमा शाळा कुंबेफळ.** पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जमीनीमधील पाण्याची पातळी खालावली आहे त्यामुळे शांळामधील हातपंप व नळ योजनांना अपुरे पाणी येत आहे. याबाबत प्रत्येक शाळानिहाय आढावा घेऊन उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल. - वैशाली ठग, शिक्षणाधीकारी, प्राथमिक