शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर तालुक्यात ३३ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:49 IST

मलकापूर: येणार्‍या काळात मलकापूर तालुक्यातील ३३ गावात पाणी  टंचाईचे सावट आहे. त्यासाठी ऑक्टोबर १७ ते जून १८ या दरम्यान  पं.स. प्रशासनाने तीन टप्प्यात त्यावर मात करण्यासाठीचे नियोजन करीत  उपाययोजना आखल्याची माहिती असून, बर्‍याच गावांची भिस्त नळगंगा  धरणाच्या जलसाठय़ावर निर्भर असल्याच सूत्रांनी सांगितले आहे. 

ठळक मुद्देतीन टप्प्यात नियोजननळगंगा धरणावर भिस्त

हनुमान जगताप। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: येणार्‍या काळात मलकापूर तालुक्यातील ३३ गावात पाणी  टंचाईचे सावट आहे. त्यासाठी ऑक्टोबर १७ ते जून १८ या दरम्यान  पं.स. प्रशासनाने तीन टप्प्यात त्यावर मात करण्यासाठीचे नियोजन करीत  उपाययोजना आखल्याची माहिती असून, बर्‍याच गावांची भिस्त नळगंगा  धरणाच्या जलसाठय़ावर निर्भर असल्याच सूत्रांनी सांगितले आहे. मलकापूर तालुक्यातील ६६ पैकी ३३ गावात म्हणजे ५0 टक्के पाणी  टंचाईचे संकट येण्याची शक्यता आहे. त्यात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान हरणखेड विहीर अधिग्रहित  करण्यात आली असून, वझीरबादचा प्रस्ताव प्राप्त झाल्याने लवकरच  त्यावर मंजुरी होईल, असे सूत्रांनी पहिल्या टप्प्यात रणगाव, शिवणी,  भालेगाव, निंबोळा, वाघोळा, चिंचोल, भानगुरा, वडजी, वरखेड,  कुंडखुर्द, तांदुळवाडी, झोडगा, वाघुड अशा ११ गावात विंधन विहिरीचे  प्रस्ताव आहेत. यापैकी दोन गावात खासगी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव  कृती आराखड्यात आहेत.तिसर्‍या टप्प्यात एप्रिल ते जून १८ दरम्यानच्या कालावधीत वाकोडी,  मलकापूर ग्रामीण, खामखेड, पिंपळखुटा महादेव,  गौलखेड, निंबाळी,  कुंड खुर्द, हरसोडा, अशा ८ गावात विंधन विहिरींचे प्रस्ताव आहेत. यापैकी वाकोडी मलकापूर ग्रामीण आदी मोठय़ा गावात ४ टँकरचे प्रस् ताव आहेत. त्यांची भिस्त नळगंगा धरणाच्या जलसाठय़ावर असून, तो  कमी झाल्यास टँकर वाढू शकतात. याशिवाय पिंपळखुटा, लासुरा,  वरखेड, पिंपळखुटा बु., कुंड बु., तांदुळवाडी, वाघुड, येथेही खासगी  विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत, तर पिंपळखुटा बु., निमखेड अशा  २ गावांसाठी टँकर प्रस्तावित आहेत. सद्यस्थितीत उपाय योजनाविषयी नमूद करावयाचे झाल्यास हरणखेड  गौलखेड येथे योजना सुरू आहेत, तर वझीराबाद, बहापुरा, पिंपळखुटा  महादेव या ठिकाणचे प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर आहेत. एकंदरीत तालु क्यातील ६६ पैकी ३३ गावावर पाणी टंचाईचे सावट असून, त्यावर मात  करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसल्याचे दिसत.

तालुक्यात मोठय़ा संख्येत गावे ही नळगंगा धरण व हतनूर धरणाच्या  बॅकवॉटर यावर अवलंबून आहेत. ‘त्या’ गावासह टंचाईग्रस्त गावासाठी  काय? उपाययोजना करायच्या त्याविषयी आम्ही प्रयत्नशील आहोत.  आमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल, असा आम्हाला विश्‍वास आहे.-डॉ.एस.टी. चव्हाण, गटविकास अधिकारी, मलकापूर 

टॅग्स :nalganga damनळगंगा धरणbuldhanaबुलडाणा