शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील धरणे तहानलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: निम्म्याच्यावर पावसाळा संपला असून, अजूनही जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. बहुतांश धरणे अद्याप तहानलेलीच  आहेत. नळयोजनांना आवश्यक एवढा जलसाठाही धरणांमध्ये झालेला नाही. त्यामुळे विविध गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेले आहे.दमदार पावसाअभावी जलसाठ्यांनी तळ गाठला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. हवामान खात्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: निम्म्याच्यावर पावसाळा संपला असून, अजूनही जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. बहुतांश धरणे अद्याप तहानलेलीच  आहेत. नळयोजनांना आवश्यक एवढा जलसाठाही धरणांमध्ये झालेला नाही. त्यामुळे विविध गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेले आहे.दमदार पावसाअभावी जलसाठ्यांनी तळ गाठला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. हवामान खात्याने यावर्षी जून, जुलैमध्ये दमदार पावसाचा अंदाज वर्तविलाहोता; मात्र जिल्ह्यात हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला. जिल्ह्यात काही भागात लवकर तर काही भागात उशिरा हजेरी लावणाºया पावसाने नंतरच्या काळात खेळ चालविला आहे. चार-पाच दिवसांच्या अंतराने पाऊस येतो; पण पावसात जोर दिसत नाही. कुठे भुरभुरी तर कुठे रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसतो. अद्याप जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यातही वाढ झालेली नसून, त्यात अल्प जलसाठा शिल्लक आहे. तर बरीच धरणे अद्याप कोरडी आहेत. दमदार पावसाअभावी विहिरींची जलपातळी कमी झालेली आहे. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.खामगाववर पाणीटंचाईचे सावटखामगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणात केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक असून, शहरावर पाणीटंचाईचे सावट आहे. गेरु माटरगावधरणक्षेत्राला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी यावर्षी धरणाच्या जलपातळीत वाढ झालेली नाही. अर्ध्याच्यावर पावसाळा उलटून गेला आहे; मात्र धरणातील जलपातळी वाढलेली नाही. शहराची दररोजची पाण्याची गरज पाहता काही महिने पुरेल इतकाच जलसाठा धरणात आहे. सध्या शहराचा पाणीपुरवठा सातव्या दिवसावर पोहचलाआहे. आणखी काही दिवसात धरणाच्या जलसाठ्यात वाढ न झाल्यास शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण होऊ शकते. संभाव्य धोका ओळखून पाण्याचा जपून वापर करणेआवश्यक आहे.