शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

बुलडाणा जिल्ह्यातील धरणे तहानलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: निम्म्याच्यावर पावसाळा संपला असून, अजूनही जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. बहुतांश धरणे अद्याप तहानलेलीच  आहेत. नळयोजनांना आवश्यक एवढा जलसाठाही धरणांमध्ये झालेला नाही. त्यामुळे विविध गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेले आहे.दमदार पावसाअभावी जलसाठ्यांनी तळ गाठला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. हवामान खात्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: निम्म्याच्यावर पावसाळा संपला असून, अजूनही जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. बहुतांश धरणे अद्याप तहानलेलीच  आहेत. नळयोजनांना आवश्यक एवढा जलसाठाही धरणांमध्ये झालेला नाही. त्यामुळे विविध गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेले आहे.दमदार पावसाअभावी जलसाठ्यांनी तळ गाठला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. हवामान खात्याने यावर्षी जून, जुलैमध्ये दमदार पावसाचा अंदाज वर्तविलाहोता; मात्र जिल्ह्यात हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला. जिल्ह्यात काही भागात लवकर तर काही भागात उशिरा हजेरी लावणाºया पावसाने नंतरच्या काळात खेळ चालविला आहे. चार-पाच दिवसांच्या अंतराने पाऊस येतो; पण पावसात जोर दिसत नाही. कुठे भुरभुरी तर कुठे रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसतो. अद्याप जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यातही वाढ झालेली नसून, त्यात अल्प जलसाठा शिल्लक आहे. तर बरीच धरणे अद्याप कोरडी आहेत. दमदार पावसाअभावी विहिरींची जलपातळी कमी झालेली आहे. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.खामगाववर पाणीटंचाईचे सावटखामगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणात केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक असून, शहरावर पाणीटंचाईचे सावट आहे. गेरु माटरगावधरणक्षेत्राला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी यावर्षी धरणाच्या जलपातळीत वाढ झालेली नाही. अर्ध्याच्यावर पावसाळा उलटून गेला आहे; मात्र धरणातील जलपातळी वाढलेली नाही. शहराची दररोजची पाण्याची गरज पाहता काही महिने पुरेल इतकाच जलसाठा धरणात आहे. सध्या शहराचा पाणीपुरवठा सातव्या दिवसावर पोहचलाआहे. आणखी काही दिवसात धरणाच्या जलसाठ्यात वाढ न झाल्यास शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण होऊ शकते. संभाव्य धोका ओळखून पाण्याचा जपून वापर करणेआवश्यक आहे.