शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

कृषी सेवा केंद्रांवर राहणार वॉच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 15:15 IST

शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करण्यासोबतच कृषी सेवा केंद्रांवर वॉच ठेवण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खरीप हंगामाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करण्यासोबतच कृषी सेवा केंद्रांवर वॉच ठेवण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचे पथक गठित करून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे.खामगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषीसेवा केंद्र धारकांना विविध सुचना देण्यात आल्या आहेत. पावसाची अनियमितता, कीड रोगांच्या प्रादुर्भावानुसार वाढलेली महागाई लक्षात घेता खरिप हंगामामध्ये कृषी विकास यंत्रणेने योग्य वाणाची लागवड करण्यास शेतकºयांना प्रवृत्त करावे. यामुळे शेतकºयांचा उत्पादनावरील खर्च कमी होवून शेतकºयांची आर्थिक उन्नती होईल.कृषीसेवा केंद्रधारक हा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील महत्वाचा दूवा आहे. शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा देण्याचे काम कृषी सेवा केंद्र धारकांचे आहे. हे काम कृषी सेवा केंद्र धारकांनी करावे. यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करुन चांगल्या प्रतीच्या गुणवत्तापूर्ण निविदा शेतकºयांना पुरवाव्या. फसवणुकीचे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अशा सुचना कृषी सेवा केंद्रधारकांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. कृषी सेवा केंद्र धारकांकडून सुचनांचे पालन न झाल्यास तसेच शेतकºयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यास, कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथक!शेतकºयांना उत्तम दर्जाचे बी-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशकांंचा पुरवठा व्हावा, यासाठी तालुका कृषी अधिकारी गिरी यांच्या नेतृत्वात गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाकडून ठिकठिकाणी अचानक भेटी देण्यात येणार आहेत. शेतकºयांची कुठेही फसवणूक होणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना याआधीच देण्यात आल्या असल्या, तरी या पथकाद्वारे वॉच ठेवला जाणार आहे. कृषी सेवा केंद्र धारकांनी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहनही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीagricultureशेती