शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

वारकरी साहित्य परिषद करणार स्वच्छतेवर जनप्रबोधन; ३६ जिल्ह्यात राबविणार उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 16:33 IST

बुलडाणा : वारकरी साहित्य परिषद शासनाच्या सहकार्याने वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेबाबत जनप्रबोधन करणार आहे.

ठळक मुद्दे हा उपक्रम राज्यातील ३६ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी एका कीर्तनकाराची निवड करण्यात येणार आहे.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : वारकरी साहित्य परिषद शासनाच्या सहकार्याने वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेबाबत जनप्रबोधन करणार आहे. हा उपक्रम राज्यातील ३६ जिल्ह्यात राबविण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यासाठी एका कीर्तनकाराची निवड करण्यात येणार आहे. पर्यावरणावर निर्माण होणारा धोका दूर करण्यासाठी शासनाने यावर्षी १३ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून गावे स्वच्छ करण्यात येत आहेत. मात्र वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेत सातत्य ठेवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मोहिमेत सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. यासाठी वारकरी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला असून परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील सांगलीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शासनाच्या सहकार्याने वृक्ष लागवड व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गंत राज्यातील ३६ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी एका कीर्तनकार, प्रवचनकार, भारूडकार त्या तालुक्यातील ग्रामीण भागात प्रवचन, भारूड व कीर्तनाच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. यावेळी सदर कीर्तनकार दिवसा प्रवचन, रात्री भारूड, कीर्तनाच्या माध्यमातून वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेबाबत माहिती देवून प्रत्यक्ष वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावात किमान ५ रोपाचे रोपण करून प्रत्येकाने वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात येणार आहे. यावेळी मोहिमेत सहभागी होणाºया प्रवचनकार, भारूडकार किंवा कीर्तनकारांना वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून प्रमाणपत्र दिले जाणार असून भविष्यात मानधन योजनेसाठी या प्रमाणपत्राचा उपयोग होणार आहे.

मुंबई येथे प्रबोधन करणाºया कीर्तनकारांची कार्यशाळा

राज्यातील ३६ जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येणाºया वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेत तालुकानिहाय सहभागी होणाºया व योगदान देणाºया कीर्तनकारांसाठी मुंबई येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेस हजर राहू शकता कां ?, गावागावात जनजागृतीसाठी वेळ देऊ शकता कां ?, ३० दिवस सुरू राहणाºया या उपक्रमासाठी मानधनाची किती अपेक्षा आहे ? याबाबत सविस्तर माहिती संबंधित प्रवचनकार, भारूडकार व कीर्तनकारांनी प्रत्येक जिल्ह्यातील वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे माहिती द्यावी, असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेने केले आहे.

वारकरी साहित्य परिषदेने शासनाच्या सहकार्याने राज्यात वृक्ष लागवड व स्वच्छतेबाबत समाज उपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील कीर्तनकारांनी सहभागी होवून राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे.

-हभप गजानन महाराज गायकवाड, मु.पो.केळवद ता.चिखली, जि.बुलडाणा. अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद, जिल्हा शाखा, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान