शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

वारकरी साहित्य परिषद करणार स्वच्छतेवर जनप्रबोधन; ३६ जिल्ह्यात राबविणार उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 16:33 IST

बुलडाणा : वारकरी साहित्य परिषद शासनाच्या सहकार्याने वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेबाबत जनप्रबोधन करणार आहे.

ठळक मुद्दे हा उपक्रम राज्यातील ३६ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी एका कीर्तनकाराची निवड करण्यात येणार आहे.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : वारकरी साहित्य परिषद शासनाच्या सहकार्याने वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेबाबत जनप्रबोधन करणार आहे. हा उपक्रम राज्यातील ३६ जिल्ह्यात राबविण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यासाठी एका कीर्तनकाराची निवड करण्यात येणार आहे. पर्यावरणावर निर्माण होणारा धोका दूर करण्यासाठी शासनाने यावर्षी १३ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून गावे स्वच्छ करण्यात येत आहेत. मात्र वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेत सातत्य ठेवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मोहिमेत सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. यासाठी वारकरी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला असून परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील सांगलीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शासनाच्या सहकार्याने वृक्ष लागवड व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गंत राज्यातील ३६ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी एका कीर्तनकार, प्रवचनकार, भारूडकार त्या तालुक्यातील ग्रामीण भागात प्रवचन, भारूड व कीर्तनाच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. यावेळी सदर कीर्तनकार दिवसा प्रवचन, रात्री भारूड, कीर्तनाच्या माध्यमातून वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेबाबत माहिती देवून प्रत्यक्ष वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावात किमान ५ रोपाचे रोपण करून प्रत्येकाने वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात येणार आहे. यावेळी मोहिमेत सहभागी होणाºया प्रवचनकार, भारूडकार किंवा कीर्तनकारांना वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून प्रमाणपत्र दिले जाणार असून भविष्यात मानधन योजनेसाठी या प्रमाणपत्राचा उपयोग होणार आहे.

मुंबई येथे प्रबोधन करणाºया कीर्तनकारांची कार्यशाळा

राज्यातील ३६ जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येणाºया वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेत तालुकानिहाय सहभागी होणाºया व योगदान देणाºया कीर्तनकारांसाठी मुंबई येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेस हजर राहू शकता कां ?, गावागावात जनजागृतीसाठी वेळ देऊ शकता कां ?, ३० दिवस सुरू राहणाºया या उपक्रमासाठी मानधनाची किती अपेक्षा आहे ? याबाबत सविस्तर माहिती संबंधित प्रवचनकार, भारूडकार व कीर्तनकारांनी प्रत्येक जिल्ह्यातील वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे माहिती द्यावी, असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेने केले आहे.

वारकरी साहित्य परिषदेने शासनाच्या सहकार्याने राज्यात वृक्ष लागवड व स्वच्छतेबाबत समाज उपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील कीर्तनकारांनी सहभागी होवून राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे.

-हभप गजानन महाराज गायकवाड, मु.पो.केळवद ता.चिखली, जि.बुलडाणा. अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद, जिल्हा शाखा, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान