शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी साहित्य परिषद करणार स्वच्छतेवर जनप्रबोधन; ३६ जिल्ह्यात राबविणार उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 16:33 IST

बुलडाणा : वारकरी साहित्य परिषद शासनाच्या सहकार्याने वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेबाबत जनप्रबोधन करणार आहे.

ठळक मुद्दे हा उपक्रम राज्यातील ३६ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी एका कीर्तनकाराची निवड करण्यात येणार आहे.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : वारकरी साहित्य परिषद शासनाच्या सहकार्याने वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेबाबत जनप्रबोधन करणार आहे. हा उपक्रम राज्यातील ३६ जिल्ह्यात राबविण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यासाठी एका कीर्तनकाराची निवड करण्यात येणार आहे. पर्यावरणावर निर्माण होणारा धोका दूर करण्यासाठी शासनाने यावर्षी १३ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून गावे स्वच्छ करण्यात येत आहेत. मात्र वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेत सातत्य ठेवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मोहिमेत सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. यासाठी वारकरी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला असून परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील सांगलीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शासनाच्या सहकार्याने वृक्ष लागवड व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गंत राज्यातील ३६ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी एका कीर्तनकार, प्रवचनकार, भारूडकार त्या तालुक्यातील ग्रामीण भागात प्रवचन, भारूड व कीर्तनाच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. यावेळी सदर कीर्तनकार दिवसा प्रवचन, रात्री भारूड, कीर्तनाच्या माध्यमातून वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेबाबत माहिती देवून प्रत्यक्ष वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावात किमान ५ रोपाचे रोपण करून प्रत्येकाने वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात येणार आहे. यावेळी मोहिमेत सहभागी होणाºया प्रवचनकार, भारूडकार किंवा कीर्तनकारांना वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून प्रमाणपत्र दिले जाणार असून भविष्यात मानधन योजनेसाठी या प्रमाणपत्राचा उपयोग होणार आहे.

मुंबई येथे प्रबोधन करणाºया कीर्तनकारांची कार्यशाळा

राज्यातील ३६ जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येणाºया वृक्ष लागवड व स्वच्छता मोहिमेत तालुकानिहाय सहभागी होणाºया व योगदान देणाºया कीर्तनकारांसाठी मुंबई येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेस हजर राहू शकता कां ?, गावागावात जनजागृतीसाठी वेळ देऊ शकता कां ?, ३० दिवस सुरू राहणाºया या उपक्रमासाठी मानधनाची किती अपेक्षा आहे ? याबाबत सविस्तर माहिती संबंधित प्रवचनकार, भारूडकार व कीर्तनकारांनी प्रत्येक जिल्ह्यातील वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे माहिती द्यावी, असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेने केले आहे.

वारकरी साहित्य परिषदेने शासनाच्या सहकार्याने राज्यात वृक्ष लागवड व स्वच्छतेबाबत समाज उपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील कीर्तनकारांनी सहभागी होवून राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे.

-हभप गजानन महाराज गायकवाड, मु.पो.केळवद ता.चिखली, जि.बुलडाणा. अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद, जिल्हा शाखा, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान