शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

विकासासाठी वार्ड पद्धतच योग्य

By admin | Updated: December 25, 2014 23:50 IST

प्रभाग नकोच : लोकमत परिचर्चेतून नगरसेवकांचा सूर.

बुलडाणा : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रभाग पद्धती बंद करून पुन्हा एकदा वार्ड पद्धत सुरू करण्याची तयारी भाजप सरकारने सुरू केली आहे. वार्ड पद्धतीमुळे पालिकांच्या निवडणुकीत होणारा अव्वाच्या सव्वा खर्च थोपविता येणार असून, ही पद्धत राजकीय पक्षाच्या सोयीची असली तरी नागरिकांच्या तसेच नगरसेवकांच्या दृष्टीने गैरसोयीची असल्यामुळे वार्ड पद्धतच योग्य आहे, असा सूर लोकमतने आज घेतलेल्या परिचर्चेतून निघाला. दरम्यान, वार्डनिहाय निवडणुका घेतल्यास नगराध्यक्ष जनतेतून निवडावा, अशा सूचनाही काही नगरसेवकांनी मांडल्या. सन २00१ पर्यंंत राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका वार्ड पद्धतीने घेण्यात येत होत्या; २00१ मध्ये शासनाने प्रभाग पद्धती सुरू केली. त्यावेळी तीन वार्डांंचा मिळून एक प्रभाग तयार करण्यात आला, त्यामुळे स्वाभाविकच एका प्रभागाचे प्रतिनिधीत्व तीन नगरसेवक करीत होते. सन २00६ मध्ये पुन्हा शासनाने प्रभाग पद्धती बंद करून वार्ड पद्धतीनुसारच पालिकेच्या निवडणुका घेतल्या; परंतु सन २0११ च्या नगरपालिका निवडणुकीत तत्कालीन कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने पुन्हा एकदा प्रभाग पद्धत सुरू केली. यावेळी एका प्रभागातील मतदारांना चार नगरसेवक निवडण्याचा अधिकार बहाल करण्यात आला होता; आता पुन्हा राज्यात नव्याने सत्तारूढ झालेल्या भाजप, शिवसेनेच्या सरकारने प्रभाग पद्धतीला मूठमाती देऊन वार्ड पद्धत सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे नगरपालिकांच्या आगामी निवडणुका वार्ड पद्धतीनेच होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ११ नगरपालिका आहेत, तर मोताळा आणि संग्रामपूर या दोन नगर पंचायती प्रस्तावित आहेत. नगरसेवक संजय गायकवाड , राजू काटीकर, दत्ता काकस, हेमंत खेडेकर, मो. सज्जाद व भाजप शहर अध्यक्ष अँड.अमोल बल्लाळ या परिचर्चेत सहभागी झाले होते.