शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

स्थलांतरीत होणारी वानखेडची जगदंबा माता

By admin | Updated: January 11, 2017 17:52 IST

देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची अनोखी परंपरा येथे जोपासली जाते. नदीच्या अ‍ैल व पैल अशा दोन तिरावर या मंदिरांची स्थापना करण्यात आली

- वासुदेव दामधर/ऑनलाइन लोकमत
 
वानखेड (ता.संग्रामपूर), दि. 11 - देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची अनोखी परंपरा येथे जोपासली जाते. नदीच्या अ‍ैल व पैल अशा दोन तिरावर या मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे. या पैकी गावाबाहेरील मंदिरात जगदंबा मातेचे महिनाभरासाठी  वास्तव्य राहते.  तर एक महिन्यानंतर पुन्हा देवीची स्थापना नदीच्या पलिकडील तीरावर म्हणजेच गावात केली जाते. या स्थलांतराला देवीच्या सासर-माहेराची संकल्पना दिल्या जाते. ही अनोखी परंपरा येथे वर्षानुवर्षांपासून जोपासल्या जात आहे.
सातपुड्याच्या कुशीतुन उगम पावलेल्या वाननदी तिरावर संग्रामपूर तालुक्यातील वानखेड हे गाव वसले आहे. या गावाचे आराध्य दैवत असलेल्या जगदंबा मातेचे नदीच्या दोन्ही तिरावर दोन पुरातन मंदिर आहेत. यामध्ये  पैलतिरावर असलेले मंदिर हे हेमाडपंथी आहे. शिवाजी महाराजांना प्रसन्न असलेल्या तुळजाभवानीची प्रतिमुर्ती येथे विराजमान आहे. मुळ पिठाच्या तिन्ही मुर्ती माता जगदंबेच्या रुपाने वानखेड येथील मंदिरात विराजमान आहेत. या मंदिरासमोर महाद्वार असून महाद्वारालगत मातेचा दुमजली रथ ठेवण्याची जागा आहे. एका आख्यायिकेनुसार देवीच्या मूर्ती या पैलतिरावरील मंदिरात होत्या.  शिवकाळातील शक्ती उपासक अमृतराव देशमुख यांच्या स्वप्नात येवून प्रतिस्थापनेची आज्ञा श्री. जगदंबा मातेकडून झाली.  त्यानंतर सद्यस्थित असलेल्या गावातील मंदिरात गावकºयांचे वतीने त्रयमुर्तीची पुन्हा स्थापणा, प्राण प्रतिष्ठा करण्यात आल्याचा इतिहास सर्वश्रृत आहे.  वानखेड येथील जगदंबा मातेच्या मंदिरात अनेक उत्सवापैकी दोन उत्सव अति हर्षोउल्हासात साजरे करण्यात येतात. यापैकी पहिला उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव होय. संपुर्ण महाराष्ट्रातून श्रध्दाळू भावीक मातेच्या दर्शनासाठी येतात. घटस्थापनेपासून अष्टमी पर्यंत दररोज मंदिरात विविध कार्यक्रमाची रेलचेल राहते. पुर्वापार ओव्या म्हणण्याचा जुना प्रघात इथे आजतागत चालु आहे. 
 
पौष पोर्णिमेचा महत्वाचा उत्सव
वानखेड येथील दुसरा उत्सव म्हणजे पौषपौर्णीमेचा मातेचा यात्रोत्सव.  पौष पौर्णीमेला सकाळी मातेला अभिषेक आरती होवून देवीच्या मुर्तीची संपुर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक म्हणजे पालखी निघते. या पालखीच्या दर्शनासाठी हजारो भावीक वानखडे येथे येतात. याच दिवशी रात्री बारा वाजता प्रभुरायचंद्राचा रथ संपुर्ण गावातुन निघून सिताहरण, रामायण युध्द व भरतभेट  असा संपुर्ण रामायणावर आधारित कार्यक़्रम सादर केला जातो. दुसºया दिवशी दहीहांडी व महाप्रसादाचा भव्य असा कार्यक्रम पुर्वापार पासून चालत आलेला आहे.
 
जगदंबा मातेच्या स्थलांतराची अनोखी परंपरा वानखेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येते. महाराष्ट्रात स्थलांतराची एकमेव परंपरा वानखेड येथे सुरू आहे. गावातील नागरिकांसह महाराष्ट्रातील भाविक येथे मोठ्यासंख्येने येतात.
- आनंदराव देशमुख
अध्यक्ष,जगदंबा देवी संस्थान, वानखेड.