शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अवकाळी नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2016 02:37 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन; दुष्काळ व पाणीटंचाइसाठी हवा वाढीव निधी.

बुलडाणा: अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळ अशा तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून मदतीची आस आहे. या पृष्ठभूमीवर बुधवारपासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आमदारांनी पक्षभेद विसरून शासनावर दबाव निर्माण केल्यास आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप होण्याचा मार्ग सुकर होईल. जिल्हय़ातील बुलडाणा, चिखली, मोताळा, मेहकर, लोणार व देऊळगावराजा या घाटावरील तालुक्यांसोबतच मोताळा, खामगाव या दोन तालुक्यांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. कांदा, गहू, हरभरा, मका, केळी, संत्रा, डाळिंब, भाजीपाला व इतर पिके या अवकाळी पावसामुळे बाधित झाली असून, सर्वाधिक नुकसान चिखली तालुक्यात झाले आहे. त्या खालोखाल मेहकर व मोताळा तालुक्याला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सद्यस्थितीत कांदा बी तसेच कांदा पीक हे फुलोरा अवस्थेत असून, अवकाळी पावसामुळे हे पीक पूर्णपणे झोपले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. गहू पीक पक्व अवस्थेत असून, शेतकरी या पिकाच्या काढणीसाठीच व्यस्त असताना अवकाळी गारपिटीमुळे हे पीकसुद्धा हातातून गेले आहे. मका, हरभरा व भाजीपाला या सोबतच संत्रा आणि डाळिंब फळबागा अवकाळी पावसामुळे प्रभावित झाल्या आहेत. यामुळे मदतीची घोषणा लवकर होऊन त्याच वेगाने वाटप झाले तर शेतकर्‍यांना दिलासा मिळेल. सन २0१३ च्या मदतीचा निधी येण्यासाठी २0१६ उजाडत असेल तर यासंदर्भातही शासनाचे लक्ष वेधून प्रशासकीय गतिमानतेचा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला पाहिजे.