शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:17 IST

विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २९ जुलै रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.यावर्षी बुलडाणा जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल बुलडाणा ९६.१० टक्के लागला आहे. या परीक्षेस जिल्ह्यातून एकूण ४३ हजार ९२२ विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी ४३ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४१ हजार ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे, शाळांचे नियोजन विस्कळीत झाले आहे.जुनमध्ये लागणारा निकाल २९ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर चार ते पाच दिवसात गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षीत होते. मात्र, आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रवेश प्रकीयेस विलंबजिल्हाभरात आयटीयआयच्या प्रवेशास प्रारंभ झाला आहे. मात्र, गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थी प्रवेश घेउ शकत नसल्याचे चित्र आहे. तसेच जिल्हास्तरावर शिक्षण विभागही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची प्रतीक्षा करीत असून त्यानंतरच ११वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. एरव्ही आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी गुणपत्रिका येत होत्या. मात्र, यावर्षी कोरोनामुळे नियोजन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.दहावी निकाल जाहीर करण्यास दोन महिन्यांचा विलंब झाला होता. महाविद्यालयांनी आॅनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरू केली असली तरी जो पर्यंत कागदपत्रे सादर करण्यात येत नाहीत, तो पर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवेश होत नाही. त्यामुळे गुणपत्रिकांची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSSC Resultदहावीचा निकाल