शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
4
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
5
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
6
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
7
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
8
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
9
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
10
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
11
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
12
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
13
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
14
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
15
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
16
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
17
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
18
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
19
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
20
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

शेतकरी तुरीच्या चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: May 25, 2017 01:53 IST

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या तूर खरेदीचे चुकारे अद्यापही न झाल्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पेरणीपूर्व मशागत तथा बी-बियाणे व खते खरेदीकरिता शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामाचे स्वप्न अंधकारमय दिसत आहे. या तालुक्यातील १५९३ शेतकऱ्यांनी २३ मे पर्यंत ३४ हजार ५५९.७१ क्विंटल तूर शासनाला दिली आहे. ज्यांचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत.जळगाव जामोद येथील तूर खरेदी केंद्रावर आतापर्यंत केंद्र शासनाच्या भारतीय खाद्य निगम (एफसीआय) च्या खरेदीसह एकूण ६७ हजार ५५६.२२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामधील एफसीआयमार्फत केंद्र शासनाने खरेदी केलेल्या ३३०९६.५१ क्विंटल तुरीचे चुकारे खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे देण्यात आले. सदर तूर खरेदी ११ जानेवारी ते २१ एप्रिलपर्यंत करण्यात आली. त्यानंतर २२ एप्रिलपासून महाराष्ट्र शासनाची तूर खरेदी सुरू झाली. त्या माध्यमातून २१ मे पर्यंत २८९३७.२३ क्विंटल तुरीची खरेदी झाली. त्यानंतर पुन्हा २२ मे पासून नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत ५५२२.४८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. त्यामुळे २२ एप्रिलपासून, तर २३ मे पर्यंत तब्बल ३८५५९.७१ क्विंटल तूर खरेदी या केंद्रावर झाली. सदर खरेदी १५९३ शेतकऱ्यांकडून करण्यात आली.शासनाने ठरवून दिलेल्या ५०५० रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाप्रमाणे जवळपास १७.५० कोटी रुपये तूर उत्पादक शेतकऱ्यांचे शासनाकडे थकले आहेत. त्यामुळे येणाऱ्या हंगामाची तयारी करताना पेरणीपूर्व मशागत व रासायनिक खते बी-बियाणे कशी खरेदी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तुरीच्या चुकाऱ्याला अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हे कोणीही सांगू शकत नाही. सद्यस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डामध्ये समितीमार्फत टोकन देऊन शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरू आहे, तर मोजणीनंतर सदर तूर ही शासनाने ठरवून दिलेल्या धुळे आणि चाळीसगाव येथील वेअर हाऊसला पोच करणे आणि त्या ठिकाणी मालाची नोंद करून पावती आणण्याचे काम स्थानिक खरेदी विक्री संघामार्फत केले जाते. सदर पावत्या डीएमओ म्हणजे जिल्हा मार्केटिंग अधिकारी बुलडाणा यांच्याकडे पाठविल्या जातात आणि डीएमओ मार्फत सदर पावत्या मुंबईला पाठविण्यात येतात. या प्रक्रियेला तब्बल १५ दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे माप झालेल्या शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे तत्काळ मिळणे आवश्यक झाले आहे. अद्यापही २४०० शेतकरी तूर मोजणीच्या प्रतीक्षेततूर मोजणी केंद्रावर आतापर्यंत २४०० शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. त्यामध्ये २२ ते २३ मे अशा दोन दिवसांत केवळ २६२ शेतकऱ्यांच्या तुरीचे माप करण्यात आले आहे, तर उर्वरित शेतकरी मापाच्या प्रतिक्षेत आहेत. तूर खरेदीची अंतिम मुदत ३१ मे पर्यंत असून, तोपर्यंत मोजमाप होण्याची चिन्ह दिसत नसल्याने ती मुदतही शासनाला वाढवावी लागणार आहे. मात्र, त्यात पावसाने घाई केल्यास शेतकरी पूर्णत: खचून जाणार आहे, एवढे मात्र निश्चित.