शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी तुरीच्या चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: May 25, 2017 01:53 IST

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या तूर खरेदीचे चुकारे अद्यापही न झाल्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पेरणीपूर्व मशागत तथा बी-बियाणे व खते खरेदीकरिता शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामाचे स्वप्न अंधकारमय दिसत आहे. या तालुक्यातील १५९३ शेतकऱ्यांनी २३ मे पर्यंत ३४ हजार ५५९.७१ क्विंटल तूर शासनाला दिली आहे. ज्यांचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत.जळगाव जामोद येथील तूर खरेदी केंद्रावर आतापर्यंत केंद्र शासनाच्या भारतीय खाद्य निगम (एफसीआय) च्या खरेदीसह एकूण ६७ हजार ५५६.२२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामधील एफसीआयमार्फत केंद्र शासनाने खरेदी केलेल्या ३३०९६.५१ क्विंटल तुरीचे चुकारे खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे देण्यात आले. सदर तूर खरेदी ११ जानेवारी ते २१ एप्रिलपर्यंत करण्यात आली. त्यानंतर २२ एप्रिलपासून महाराष्ट्र शासनाची तूर खरेदी सुरू झाली. त्या माध्यमातून २१ मे पर्यंत २८९३७.२३ क्विंटल तुरीची खरेदी झाली. त्यानंतर पुन्हा २२ मे पासून नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत ५५२२.४८ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. त्यामुळे २२ एप्रिलपासून, तर २३ मे पर्यंत तब्बल ३८५५९.७१ क्विंटल तूर खरेदी या केंद्रावर झाली. सदर खरेदी १५९३ शेतकऱ्यांकडून करण्यात आली.शासनाने ठरवून दिलेल्या ५०५० रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाप्रमाणे जवळपास १७.५० कोटी रुपये तूर उत्पादक शेतकऱ्यांचे शासनाकडे थकले आहेत. त्यामुळे येणाऱ्या हंगामाची तयारी करताना पेरणीपूर्व मशागत व रासायनिक खते बी-बियाणे कशी खरेदी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तुरीच्या चुकाऱ्याला अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हे कोणीही सांगू शकत नाही. सद्यस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डामध्ये समितीमार्फत टोकन देऊन शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरू आहे, तर मोजणीनंतर सदर तूर ही शासनाने ठरवून दिलेल्या धुळे आणि चाळीसगाव येथील वेअर हाऊसला पोच करणे आणि त्या ठिकाणी मालाची नोंद करून पावती आणण्याचे काम स्थानिक खरेदी विक्री संघामार्फत केले जाते. सदर पावत्या डीएमओ म्हणजे जिल्हा मार्केटिंग अधिकारी बुलडाणा यांच्याकडे पाठविल्या जातात आणि डीएमओ मार्फत सदर पावत्या मुंबईला पाठविण्यात येतात. या प्रक्रियेला तब्बल १५ दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे माप झालेल्या शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे तत्काळ मिळणे आवश्यक झाले आहे. अद्यापही २४०० शेतकरी तूर मोजणीच्या प्रतीक्षेततूर मोजणी केंद्रावर आतापर्यंत २४०० शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. त्यामध्ये २२ ते २३ मे अशा दोन दिवसांत केवळ २६२ शेतकऱ्यांच्या तुरीचे माप करण्यात आले आहे, तर उर्वरित शेतकरी मापाच्या प्रतिक्षेत आहेत. तूर खरेदीची अंतिम मुदत ३१ मे पर्यंत असून, तोपर्यंत मोजमाप होण्याची चिन्ह दिसत नसल्याने ती मुदतही शासनाला वाढवावी लागणार आहे. मात्र, त्यात पावसाने घाई केल्यास शेतकरी पूर्णत: खचून जाणार आहे, एवढे मात्र निश्चित.