शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींच्या प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा

By admin | Updated: April 6, 2016 00:37 IST

बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांना दुष्काळापासून दिलासा नाहीच; अनुदानासाठी हेलपाटे.

बुलडाणा : पावसाची अनियमितता, त्यातून निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी पार कोलमडून गेला आहे. दुष्काळाच्या या दृष्टचक्रातून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांसाठी नवीन विहिरी, विहीर पुनर्भरण, सिंचन विहिरी, विहीर दुरुस्तीची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू केली आहेत. शेतकर्‍यांना विविध योजनांसाठी विहिरी मंजूर केल्या असल्या, तरी विहीर खोदण्यासाठीच्या अनुदानाकरिता तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये शासनाने विहिरीवर अधिक भर दिला आहे. शेतात विहीर असली तर शेतकरी एक पीक शिल्लक घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त विहिरीचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध योजनेच्या सुमारे १0 हजार विहिरीेचे वाटप करण्यात आले असून, कोट्यवधी रुपये या विहिरीवर खर्च होणार आहेत. धडक सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यात २५00 विहिरी, नरेगाच्या ७८0 विहिरी तर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने तब्बल २९00 विहिरीचे टार्गेट ठेवले आहे. यावर सुमारे ७७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. विहिरीचे वाटप झाले. अनेक शेतकर्‍यांनी विहिरीचे खोदकाम केले, बांधकामही पूर्ण केले; मात्र आता अनुदानासाठी शे तकर्‍यांना पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. धडक सिंचन योजनेच्या विहिरीची किंमत २ लाख ५0 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. शेतकर्‍यांना आधी खोदकाम करावे लागते. पहिल्या हप्त्यात झालेल्या खोदकामाचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या जाते; मात्र कामे पूर्ण होऊनही लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही. निधी उ पलब्ध असताना आणि त्रुट्या नसताना लाभार्थ्यांची जिल्हाभर अनुदानासाठी ससेहोलपट सुरू असल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यात नरेगाच्या जवळपास ७00 विहिरी मंजूर झाल्या असून, या विहिरींचा पैसा मजुरांच्या खात्यात जमा होतो. कामाच्या प्रग तीनुसार दर आठवड्याला झालेल्या कामाचा अहवाल तयार होतो. अहवालानुसार मजुरांच्या खात्यात पैसे जमा व्हायला हवेत; मात्र अनेकवेळा तसे होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी विहिरीची कामे थंडबस् त्यात पडून आहेत.

३६ हजार मजुरांची उपस्थिती संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित केल्यामुळे जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर दुष्काळी कामे सुरू झाली आहेत. ३१ मार्च अखेर जिल्ह्यात ८१0 कामे सुरू होती. या कामावर ३६ हजार २४६ मजूर काम करीत आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीची कामे ४३९ असून, ग्रामपंचायतीच्या कामावर २२ हजार २७0 मजूर आहेत, तर विविध यंत्रणेमार्फत सुरू असलेली कामे ३७१ असून, या कामांवर १३ हजार ९७६ मजूर काम करीत आहेत. एप्रिल व मे महिन्यात कामाची संख्या वाढणार असून, मजुरांची संख्या वाढणार आहे, अशी माहिती रोहयोचे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाघमोडे यांनी दिली. दरम्यान, मार्चच्या सरत्या आठवड्यात ४३ ग्रामपंचायतमधील कामे पूर्ण करण्यात आली.