शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पातील प्राथमिक अडचणी दूर

By admin | Updated: March 23, 2017 02:36 IST

मुख्यमंत्र्याचा पुढाकार तुपकरांना जलसंपदामंत्र्यांची ग्वाही

सुधीर चेके पाटीलचिखली (बुलडाणा), दि. २२- सुमारे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार्‍या वैनगंगा-नळगंगा या नदीजोड प्रकल्पातील प्राथमिक अडचणी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने दूर झाल्या आहेत. या योजनेचा सविस्तर अहवाल मार्च अखेरीस पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पासाठी केंद्र शासनाचा निधी प्राप्त करून घेण्यासाठी प्राधान्य दिल्या जाणार असल्याचे आश्‍वासन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांना दिले आहे.प्रस्तूत नदीजोड प्रकल्प पूर्ण झाल्यास आत्महत्याग्रस्त विदर्भातील या जिल्हय़ांमध्ये भरभराट येईल. बुलडाणा व अकोला या अवर्षणप्रवण जिल्हय़ातील खारपाणपट्यात तसेच जिगाव प्रकल्पाचे लाभक्षेत्र सोडून घाटाखालील अधिकाधिक गावांना पाणी मिळू शकेल. विदर्भातील प्रस्तावित औष्णिक विद्युत प्रकल्पांनाही पाणी उपलब्ध होऊन या भागाची विजेची मागणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून विदर्भासाठी नवसंजीवनी ठरणार्‍या या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुषंगाने जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना याबाबत उचित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाजन यांनी तुपकर यांना याबाबत लेखी खुलासा पाठविला आहे. यामध्ये राष्ट्रीय जलविकास अभिकरण (एनडब्युडीए) मार्फत वैनगंगा-नळगंगा योजनेचा अभ्यास सुरू असून १९१२ दलघमी पाणी वापराकरीता राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने जुलै २0१५ मध्ये योजनेचा व्यवहार्यता अहवाल नव्याने तयार केला आहे. राष्ट्रीय जलविकास अभिकरणाकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मार्च २0१७ पर्यंंत पूर्ण करण्याचे नियोजित असून वळण कालव्याचे सर्वेक्षण १८९.५ किमी वर्धा नदीपर्यंंत पूर्ण करण्यात आले आहे. भूगर्भीय व भूतांत्रीक अन्वेषणाअंतर्गत ९४ किमी भागाचे ह्यमॅपींगह्ण पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय जलविकास अभिकरण अन्वेषण विभाग नागपूर, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ नागपूर व अमरावती यांच्या मार्फत संयुक्तरित्या नदीजोड कालव्याची संरेख, साठा स्थळे व लाभक्षेत्र आदी बाबी ठरविण्यात येत असून राष्ट्रीय जलविकास अभिकरणाकडून वैनगंगा-नळगंगा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यावर शासन स्तरावरून यास मान्यता प्राप्त झाल्यावर प्रकल्पास प्राधान्य देवून केंद्र शासनाचा निधी या योजनेकरीता प्राप्त करण्यास्तव प्रयत्न करण्यात येतील, असेही जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांनी या लेखी कळविले आहे. प्रकल्पाचे पाणी मराठवाड्याकडे नेण्याचा घातला होता घाट नदीजोड प्रकल्पाची उपयोगीता व गरज लोकमतमध्ये वृत्तमालीकेतून उजेडात आणल्यानंतर रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रकल्पाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास न्यावा व विदर्भाचे पाणी मराठवाड्याला वळविण्याचा प्रयत्न हाणून पाडावा, अशी मागणी केली होती.या प्रकल्पातून बुलडाणा आणि अकोला जिल्हा वगळून यवतमाळमार्गे हिंगोली, जालना, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड या जिल्हय़ांना पाणी वळते करण्याचे प्रयत्न मध्यतंरी सुरू होते. मात्र, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकल्पाबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने मुख्यमंत्र्यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना याबाबत उचित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.