शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

व्हीएसटीएफ, युनिसेफची विशेष मोहिम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 15:39 IST

बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील २५ जिल्ह्याती ८५० गावांमध्ये आॅगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान, प्रामुख्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठाण आणि संयुक्त राष्ट्राचा बाल आपत्ती निधी (युनिसेफ शाखा, भारत) यांच्या वतीने बालहक्क रक्षणाचे उदिष्ट घेवून सुरू करण्यात आलेली मोहिम आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील २५ जिल्ह्याती ८५० गावांमध्ये आॅगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान, प्रामुख्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे.या मोहिमेचा आता २८ नोव्हेंबर रोजी समारोप होत असून तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील मोहिम १४ नोव्हेंबरला सुरू झाली होती. गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येऊन अनुषंगीक विषयान्वये जनजागृती करण्यात येऊन शाळांमधील मुलांच्या गैरहजेरीचा आढावा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात आले. सोबतच गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसदर्भात माहिती घेऊन माहिती संकलीत करण्यात आली. शेवटच्या टप्प्यात बालविवाहाची अनिष्ठप्रथा रोखण्यासाठी ग्रामपातळीवर उपाययोजना करण्यासोबतच अशा घटनांची प्रशासनाला कशी माहिती द्यावी, याबाबत प्रशिक्षणही दिल्या जात आहे.योजनेचा पहिला टप्पा १५ आॅगस्टला सुरू झाला होता. दरम्यान, बचतगट कार्यकर्त्यांशीही बालविवाह समस्येविषयी चर्चा करण्यात आली आहे. या प्रक्रियेत युनिसेफचे अधिकारीही सहभागी झालेले असून ग्रामस्थांना ते माहिती देत आहेत.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणा