शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

व्हीएसटीएफ, युनिसेफची विशेष मोहिम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 15:39 IST

बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील २५ जिल्ह्याती ८५० गावांमध्ये आॅगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान, प्रामुख्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठाण आणि संयुक्त राष्ट्राचा बाल आपत्ती निधी (युनिसेफ शाखा, भारत) यांच्या वतीने बालहक्क रक्षणाचे उदिष्ट घेवून सुरू करण्यात आलेली मोहिम आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील २५ जिल्ह्याती ८५० गावांमध्ये आॅगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान, प्रामुख्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे.या मोहिमेचा आता २८ नोव्हेंबर रोजी समारोप होत असून तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील मोहिम १४ नोव्हेंबरला सुरू झाली होती. गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येऊन अनुषंगीक विषयान्वये जनजागृती करण्यात येऊन शाळांमधील मुलांच्या गैरहजेरीचा आढावा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात आले. सोबतच गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसदर्भात माहिती घेऊन माहिती संकलीत करण्यात आली. शेवटच्या टप्प्यात बालविवाहाची अनिष्ठप्रथा रोखण्यासाठी ग्रामपातळीवर उपाययोजना करण्यासोबतच अशा घटनांची प्रशासनाला कशी माहिती द्यावी, याबाबत प्रशिक्षणही दिल्या जात आहे.योजनेचा पहिला टप्पा १५ आॅगस्टला सुरू झाला होता. दरम्यान, बचतगट कार्यकर्त्यांशीही बालविवाह समस्येविषयी चर्चा करण्यात आली आहे. या प्रक्रियेत युनिसेफचे अधिकारीही सहभागी झालेले असून ग्रामस्थांना ते माहिती देत आहेत.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणा