शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

मतदारांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटीला उमेदवारांचे प्राधान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:27 IST

अमोल ठाकरे। लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राजकीय आखाडा दिवसेंदिवस चांगलाच तापू लागला आहे. यामध्ये काकनवाडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अविरोध झाले असून, दोन ग्रामपंचायतींकरिता सरपंचपदाकरिता अर्जच न आल्यामुळे दोन ग्रामपंचायती रिक्त राहणार असून, १८ सरपंच निवडले जाणार आहेत. यासाठी एकूण २६ हजार ७९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ...

ठळक मुद्दे २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राजकीय आखाडादिवसेंदिवस चांगलाच तापू लागला आहेवर्चस्व राहावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष गाव पुढार्‍यांकडून जोरदार फिल्डिंग

अमोल ठाकरे। लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राजकीय आखाडा दिवसेंदिवस चांगलाच तापू लागला आहे. यामध्ये काकनवाडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अविरोध झाले असून, दोन ग्रामपंचायतींकरिता सरपंचपदाकरिता अर्जच न आल्यामुळे दोन ग्रामपंचायती रिक्त राहणार असून, १८ सरपंच निवडले जाणार आहेत. यासाठी एकूण २६ हजार ७९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष गाव पुढार्‍यांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.२१ ग्रामपंचायतींकरिता ग्रामपंचायत सदस्यांची संख्या १७३ एवढी असून, यापैकी ८२ सदस्य अविरोध झाले आहेत. तर ८७ सदस्यांचा जागाकरिता २0२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण २६ हजार ७९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १४ हजार ५७७ असून, स्त्री मतदारांची संख्या १२ हजार २२१ एवढी आहे. यावर्षी प्रथमच गावचे सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची, अटीतटीची होणार आहे. त्यामुळे संपूर्ण गावातील मतदारांची मर्जी सांभाळताना सरपंच पदासाठी बाशिंग बांधलेल्या इच्छुकांची चांगलीच दमछाक होत आहे. काही गावांमध्ये तर सख्खे काका-पुतणे हे सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. सरपंचपदी आपलीच निवड जनतेने करावी त्याकरिता इच्छुक उमेदवार घरोघरी जाऊन आश्‍वासनांची खैरात वाटत आहेत. आतापासूनच रंगीत, संगीत व ओल्या पाटर्य़ांची मेजवानी धुमधडाक्यात सुरू आहे; मात्र मतदार आपल्यालाच निवडून देणार की पराभवाचा धक्का देणार, या चिंतेने सरपंचपदासह सदस्य होण्याचे स्वप्न पाहणार्‍यांची झोप उडाल्याचे चित्र आहे. मतदानाच्या अंतिम तारखेपर्यंत मतदार राजाला आपलेसे कसा करता येईल, त्याचे मत आपल्याच पारड्यात कसे पाडून घेता येईल, यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न केले जात आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व सक्षम अशा तालुक्यातील १८ ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे. यासाठी तगडी प्रचार यंत्रणा राबविण्यासह डोअर टू डोअर प्रचार करून मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.