शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

मतदारांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटीला उमेदवारांचे प्राधान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:27 IST

अमोल ठाकरे। लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राजकीय आखाडा दिवसेंदिवस चांगलाच तापू लागला आहे. यामध्ये काकनवाडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अविरोध झाले असून, दोन ग्रामपंचायतींकरिता सरपंचपदाकरिता अर्जच न आल्यामुळे दोन ग्रामपंचायती रिक्त राहणार असून, १८ सरपंच निवडले जाणार आहेत. यासाठी एकूण २६ हजार ७९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ...

ठळक मुद्दे २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राजकीय आखाडादिवसेंदिवस चांगलाच तापू लागला आहेवर्चस्व राहावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष गाव पुढार्‍यांकडून जोरदार फिल्डिंग

अमोल ठाकरे। लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राजकीय आखाडा दिवसेंदिवस चांगलाच तापू लागला आहे. यामध्ये काकनवाडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अविरोध झाले असून, दोन ग्रामपंचायतींकरिता सरपंचपदाकरिता अर्जच न आल्यामुळे दोन ग्रामपंचायती रिक्त राहणार असून, १८ सरपंच निवडले जाणार आहेत. यासाठी एकूण २६ हजार ७९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष गाव पुढार्‍यांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.२१ ग्रामपंचायतींकरिता ग्रामपंचायत सदस्यांची संख्या १७३ एवढी असून, यापैकी ८२ सदस्य अविरोध झाले आहेत. तर ८७ सदस्यांचा जागाकरिता २0२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण २६ हजार ७९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १४ हजार ५७७ असून, स्त्री मतदारांची संख्या १२ हजार २२१ एवढी आहे. यावर्षी प्रथमच गावचे सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची, अटीतटीची होणार आहे. त्यामुळे संपूर्ण गावातील मतदारांची मर्जी सांभाळताना सरपंच पदासाठी बाशिंग बांधलेल्या इच्छुकांची चांगलीच दमछाक होत आहे. काही गावांमध्ये तर सख्खे काका-पुतणे हे सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. सरपंचपदी आपलीच निवड जनतेने करावी त्याकरिता इच्छुक उमेदवार घरोघरी जाऊन आश्‍वासनांची खैरात वाटत आहेत. आतापासूनच रंगीत, संगीत व ओल्या पाटर्य़ांची मेजवानी धुमधडाक्यात सुरू आहे; मात्र मतदार आपल्यालाच निवडून देणार की पराभवाचा धक्का देणार, या चिंतेने सरपंचपदासह सदस्य होण्याचे स्वप्न पाहणार्‍यांची झोप उडाल्याचे चित्र आहे. मतदानाच्या अंतिम तारखेपर्यंत मतदार राजाला आपलेसे कसा करता येईल, त्याचे मत आपल्याच पारड्यात कसे पाडून घेता येईल, यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न केले जात आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व सक्षम अशा तालुक्यातील १८ ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे. यासाठी तगडी प्रचार यंत्रणा राबविण्यासह डोअर टू डोअर प्रचार करून मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.