शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

अंढेरा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन महिना लाेटला असला तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीककर्ज मिळालेले नाही़ त्यातच अंढेरा येथील ...

अंढेरा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन महिना लाेटला असला तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीककर्ज मिळालेले नाही़ त्यातच अंढेरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी सुटीवर गेल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा अंढेरा येथे असून, या शाखेअंतर्गत सेवानगर, पिप्री आंधळे, मेंडगाव, बायगाव, सावखेड नागरे, शिवणी आरमाळ हे गावे येतात. सध्या पेरणीचे दिवस सुरू असताना सगळीकडे पीककर्ज वाटप सुरू आहे. अंढेरा येथे मात्र येथील शाखेचे व्यवस्थापक हे गेल्या पंधरा दिवसांपासून सुटी असल्याने पीक कर्जवाटप रखडलेले आहे़

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना नव्याने पीक कर्जवाटपाचे अधिकार मिळाले आहेत. शाखा व्यवस्थापक गौरव जगताप सुटीवर असल्याने शेतकऱ्यांना पीककर्जासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. नव्याने पीककर्ज मागणीसाठी या भागातील शेतकऱ्यांनी देऊळगाव मही येथील बँकेकडे मागणी केली असता तुमचे कार्यक्षेत्र या बँकेकडे येत नसल्याचे कारण सांगण्यात आले.

अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली हाेती. त्यानंतर दहा ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खाेळंबल्या आहेत. पीककर्ज मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली आहे़ मात्र, महिना लाेटल्यानंतरही शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, याविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांच्याशी संपर्क केला असता अंढेरा येथे लवकरच पर्यायी शाखा व्यवस्थापक पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सहायक व्यवस्थापकांकडे दिला प्रभार

परिसरातील शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यासाठी हाेत असलेला विलंब पाहता जिल्हा अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांनी सहायक व्यवस्थापक विनायक पाठक यांच्याकडे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या अंढेरा शाखेचा पदभार दिला आहे़ त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पीक कर्जवाटपाची गती वाढवण्याची गरज आहे.