शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

अंढेरा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन महिना लाेटला असला तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीककर्ज मिळालेले नाही़ त्यातच अंढेरा येथील ...

अंढेरा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन महिना लाेटला असला तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीककर्ज मिळालेले नाही़ त्यातच अंढेरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी सुटीवर गेल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा अंढेरा येथे असून, या शाखेअंतर्गत सेवानगर, पिप्री आंधळे, मेंडगाव, बायगाव, सावखेड नागरे, शिवणी आरमाळ हे गावे येतात. सध्या पेरणीचे दिवस सुरू असताना सगळीकडे पीककर्ज वाटप सुरू आहे. अंढेरा येथे मात्र येथील शाखेचे व्यवस्थापक हे गेल्या पंधरा दिवसांपासून सुटी असल्याने पीक कर्जवाटप रखडलेले आहे़

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना नव्याने पीक कर्जवाटपाचे अधिकार मिळाले आहेत. शाखा व्यवस्थापक गौरव जगताप सुटीवर असल्याने शेतकऱ्यांना पीककर्जासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. नव्याने पीककर्ज मागणीसाठी या भागातील शेतकऱ्यांनी देऊळगाव मही येथील बँकेकडे मागणी केली असता तुमचे कार्यक्षेत्र या बँकेकडे येत नसल्याचे कारण सांगण्यात आले.

अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली हाेती. त्यानंतर दहा ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खाेळंबल्या आहेत. पीककर्ज मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली आहे़ मात्र, महिना लाेटल्यानंतरही शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, याविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांच्याशी संपर्क केला असता अंढेरा येथे लवकरच पर्यायी शाखा व्यवस्थापक पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सहायक व्यवस्थापकांकडे दिला प्रभार

परिसरातील शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यासाठी हाेत असलेला विलंब पाहता जिल्हा अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांनी सहायक व्यवस्थापक विनायक पाठक यांच्याकडे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या अंढेरा शाखेचा पदभार दिला आहे़ त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पीक कर्जवाटपाची गती वाढवण्याची गरज आहे.