शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

अंढेरा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन महिना लाेटला असला तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीककर्ज मिळालेले नाही़ त्यातच अंढेरा येथील ...

अंढेरा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन महिना लाेटला असला तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीककर्ज मिळालेले नाही़ त्यातच अंढेरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी सुटीवर गेल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा अंढेरा येथे असून, या शाखेअंतर्गत सेवानगर, पिप्री आंधळे, मेंडगाव, बायगाव, सावखेड नागरे, शिवणी आरमाळ हे गावे येतात. सध्या पेरणीचे दिवस सुरू असताना सगळीकडे पीककर्ज वाटप सुरू आहे. अंढेरा येथे मात्र येथील शाखेचे व्यवस्थापक हे गेल्या पंधरा दिवसांपासून सुटी असल्याने पीक कर्जवाटप रखडलेले आहे़

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना नव्याने पीक कर्जवाटपाचे अधिकार मिळाले आहेत. शाखा व्यवस्थापक गौरव जगताप सुटीवर असल्याने शेतकऱ्यांना पीककर्जासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. नव्याने पीककर्ज मागणीसाठी या भागातील शेतकऱ्यांनी देऊळगाव मही येथील बँकेकडे मागणी केली असता तुमचे कार्यक्षेत्र या बँकेकडे येत नसल्याचे कारण सांगण्यात आले.

अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली हाेती. त्यानंतर दहा ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खाेळंबल्या आहेत. पीककर्ज मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली आहे़ मात्र, महिना लाेटल्यानंतरही शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, याविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांच्याशी संपर्क केला असता अंढेरा येथे लवकरच पर्यायी शाखा व्यवस्थापक पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सहायक व्यवस्थापकांकडे दिला प्रभार

परिसरातील शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यासाठी हाेत असलेला विलंब पाहता जिल्हा अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांनी सहायक व्यवस्थापक विनायक पाठक यांच्याकडे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या अंढेरा शाखेचा पदभार दिला आहे़ त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पीक कर्जवाटपाची गती वाढवण्याची गरज आहे.