शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बांधकाम साहित्य हटविण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या

By विवेक चांदुरकर | Updated: May 20, 2024 18:28 IST

सावरगांव नेहू येथील विश्वगंगा नदीवरील पुलाचे काम करण्यात आले.

मलकापूर : सावरगांव नेहू येथील विश्वगंगा नदीवरील पुलाचे काम करण्यात आले. मात्र उर्वरित बांधकाम साहित्य तेथेच ठेवले. यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे गावकऱ्याने बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी करीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. गत काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नांदुरा तालुक्यातील सावरगांव नेहू येथील विश्वगंगा नदीवरील पुलाचे काम करण्यात आले. यात जुन्या पुलाचे अवशेष, मटेरियल, माती नदीच्या पात्रात तशीच ठेवण्यात आली. आगामी पावसाळ्यात पुरामुळे धोका निर्माण होऊ शकतो. 

याबाबत केशव त्र्यंबक बाठे पाटील यांनी संबंधित ठेकेदार व अभियंत्यांना वारंवार पत्र देवून माहिती दिली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्रस्त झालेल्या गावकऱ्याने थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे खळबळ उडाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केशव बाठे पाटील यांना लेखी पत्र देऊन आठ दिवसांत कारवाईसाठी आश्वस्त करण्यात आले आहे. कारवाई न झाल्यास मुख्य अभियंता अकोला यांच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा बाठे पाटील यांनी दिला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा