शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

विजय विजय असतो, प्रजेने त्यांना निवडले- गुलाबराव पाटील

By निलेश जोशी | Updated: May 14, 2023 01:00 IST

कर्नाटकातील विजयावर प्रतिक्रिया, परंतु लोकसभा निवडणूक अद्याप लांबच

नीलेश जोशी, बुलढाणा: विजय हा विजयच असतो. लोकशाहीत प्रजा राजा आहे. त्यांचा कौल महत्त्वाचा आहे. कर्नाटकमध्ये प्रजेने त्यांचा राजा निवडला असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे सांगितले. आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने खरीप आढावा बैठकीचे आयोजन बुलढाण्यात करण्यात आले होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान आपण काही कर्नाटकमध्ये प्रचारासाठी गेलो नव्हतो. त्यामुळे हा प्रश्न मला विचारणे सयुक्तिक नाही असेही त्यांनी सांगितले. या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होईल का? याबाबत त्यांना छेडले असता लोकसभा निवडणूक अद्याप लांबच आहे, असे वक्तव्य करत त्यांनी या विषयाला बगल दिली. संजय राऊतांसंदर्भात प्रश्न केला असता हा काय बोलण्याचा विषय आहे का? असे सांगत त्यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीला निरूत्तर करत पत्रकार परिषद आटोपती घेतली.

दरम्यान आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने बी-बियाणे, खतांचे योग्य नियोजन करण्यात आले असून कोठेही कमतरता पडणार नाही. अवकाळी पाऊस टप्प्याटप्प्याने पडला. त्यामुळे एकाच वेळी पंचनामे होऊ शकले नाही. परंतु आता ते १०० टक्के झाले आहे. त्यासंदर्भाने प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत देण्यासाठी आम्ही पावले उचलत असल्याचेही ते म्हणाले.

विचार घेऊन मैदानात या- खा. प्रतापराव जाधव

शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर करत असलेल्या वक्तव्यासंदर्भात यावेळी खा. प्रतापराव जाधव यांना विचारणा केली असता ते काहीही बोलतात. यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. सेक्युलर झाले. राजीनामे देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा ते सल्ला देत असल्याबाबत ही खा. जाधवांनी त्यांचा समाचार घेतला. आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आचरणात आणा आणि मग मैदानात उतरा, असा टोलाच उद्धव ठाकरे यांना त्यांनी लगावला. दरम्यान २०२४ काय २०२९ मध्येही देशात भाजप-शिवसेनेची सत्ता राहील असे सांगितले. आघाडीमध्ये आताच बिघाडी आहे. त्यांची तोंडे तीन दिशेला आहे. येणाऱ्या काळात हे अधिक स्पष्टपणे जाणवेल असे ते म्हणाले.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटील