शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

विजय विजय असतो, प्रजेने त्यांना निवडले- गुलाबराव पाटील

By निलेश जोशी | Updated: May 14, 2023 01:00 IST

कर्नाटकातील विजयावर प्रतिक्रिया, परंतु लोकसभा निवडणूक अद्याप लांबच

नीलेश जोशी, बुलढाणा: विजय हा विजयच असतो. लोकशाहीत प्रजा राजा आहे. त्यांचा कौल महत्त्वाचा आहे. कर्नाटकमध्ये प्रजेने त्यांचा राजा निवडला असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे सांगितले. आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने खरीप आढावा बैठकीचे आयोजन बुलढाण्यात करण्यात आले होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान आपण काही कर्नाटकमध्ये प्रचारासाठी गेलो नव्हतो. त्यामुळे हा प्रश्न मला विचारणे सयुक्तिक नाही असेही त्यांनी सांगितले. या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होईल का? याबाबत त्यांना छेडले असता लोकसभा निवडणूक अद्याप लांबच आहे, असे वक्तव्य करत त्यांनी या विषयाला बगल दिली. संजय राऊतांसंदर्भात प्रश्न केला असता हा काय बोलण्याचा विषय आहे का? असे सांगत त्यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीला निरूत्तर करत पत्रकार परिषद आटोपती घेतली.

दरम्यान आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने बी-बियाणे, खतांचे योग्य नियोजन करण्यात आले असून कोठेही कमतरता पडणार नाही. अवकाळी पाऊस टप्प्याटप्प्याने पडला. त्यामुळे एकाच वेळी पंचनामे होऊ शकले नाही. परंतु आता ते १०० टक्के झाले आहे. त्यासंदर्भाने प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत देण्यासाठी आम्ही पावले उचलत असल्याचेही ते म्हणाले.

विचार घेऊन मैदानात या- खा. प्रतापराव जाधव

शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर करत असलेल्या वक्तव्यासंदर्भात यावेळी खा. प्रतापराव जाधव यांना विचारणा केली असता ते काहीही बोलतात. यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. सेक्युलर झाले. राजीनामे देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा ते सल्ला देत असल्याबाबत ही खा. जाधवांनी त्यांचा समाचार घेतला. आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आचरणात आणा आणि मग मैदानात उतरा, असा टोलाच उद्धव ठाकरे यांना त्यांनी लगावला. दरम्यान २०२४ काय २०२९ मध्येही देशात भाजप-शिवसेनेची सत्ता राहील असे सांगितले. आघाडीमध्ये आताच बिघाडी आहे. त्यांची तोंडे तीन दिशेला आहे. येणाऱ्या काळात हे अधिक स्पष्टपणे जाणवेल असे ते म्हणाले.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटील