शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात फसतात वाहने, शेतातून माल घरापर्यंत न्यायचा कसा?

By ब्रह्मानंद जाधव | Updated: October 27, 2023 16:10 IST

किनगाव जट्टू परिसरात एकही शेतरस्ता व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना बाराही महिने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

किनगाव जट्टू : हंगामाच्या वेळी शेतात तयार झालेला शेतमाल शेतातून घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांना तारेवारची कसरत करावी लागत आहे. पाणंद रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने जीवघेण्या शेत रस्त्यात शेतकरी अडकल्याचे चित्र किनगाव जट्टू परिसरात दिसत आहे. पाणंद रस्त्यात ट्रॅक्टर फसत असल्याने शेतातून माल घरापर्यंत न्यायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

किनगाव जट्टू परिसरात एकही शेतरस्ता व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना बाराही महिने अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील शेतरस्ते शेतकऱ्याचे शेतीचे उत्पादन वाढीकरिता अत्यंत महत्त्वाचे असल्याने शासनाच्यावतीने पालकमंत्री पाणंद रस्ते, मातोश्री पांदण रस्ते अशा विविध नावाने योजना काढण्यात आल्या आहेत. परंतु परिसरातील रस्त्यांचे कुठलीच कामे झाले नसून केवळ कागदोपत्रीच ही कामे पडून राहिल्याने बाराही महिने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी भरपूर प्रमाणात शेती पडीत राहत असल्याने शेती मशागतीचे अवजारे शेतकऱ्यांना कोठूनही नेता येत होते. परंतु कुटुंबातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण मालकीचे जमिनीचे क्षेत्र वहिती करण्यात आल्याने ते पूर्वीचे रस्ते बंद झाले आहेत. पूर्वीच्या वहिवाटीचे पांणद रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेतकऱ्यांनीच अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत.

शेतमाल अडकला रस्त्यातकिनगावजट्टू येथील शेतकरी खोटे यांच्या शेतातून सोयाबीनचा माल घरी आणण्यासाठी मालवाहू वाहन नेण्यात आले. दरम्यान, वसंतनगर शिवारातून सोयाबीनचा शेतमाल मालवाहू वाहनाने शेतातून घरी आणत असताना पाणंद रस्त्यात ते वाहन फसले. दरम्यान, दुसरे ट्रॅक्टर आणून ते वाहन काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागली.

रस्त्याला बघून ना ट्रॅक्टर येत, ना शेतमजूरकृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण झाले असल्याने पेरणीपूर्व मशागतीसह नागरणी वखरणी पेरणी कीटकनाशक फवारणी शेतीची इतर कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात. परंतु अरुंद शेत रस्ते, त्यातही पावसाळ्यात गटारे होत असल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर शेतात मशागती करिता नेण्यासाठी ट्रॅक्टर मालक तयार होत नाहीत. शेतमजूरही रस्त्याच्या त्रासामुळे शेतात येत नाहीत.