शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात फसतात वाहने, शेतातून माल घरापर्यंत न्यायचा कसा?

By ब्रह्मानंद जाधव | Updated: October 27, 2023 16:10 IST

किनगाव जट्टू परिसरात एकही शेतरस्ता व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना बाराही महिने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

किनगाव जट्टू : हंगामाच्या वेळी शेतात तयार झालेला शेतमाल शेतातून घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांना तारेवारची कसरत करावी लागत आहे. पाणंद रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने जीवघेण्या शेत रस्त्यात शेतकरी अडकल्याचे चित्र किनगाव जट्टू परिसरात दिसत आहे. पाणंद रस्त्यात ट्रॅक्टर फसत असल्याने शेतातून माल घरापर्यंत न्यायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

किनगाव जट्टू परिसरात एकही शेतरस्ता व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना बाराही महिने अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील शेतरस्ते शेतकऱ्याचे शेतीचे उत्पादन वाढीकरिता अत्यंत महत्त्वाचे असल्याने शासनाच्यावतीने पालकमंत्री पाणंद रस्ते, मातोश्री पांदण रस्ते अशा विविध नावाने योजना काढण्यात आल्या आहेत. परंतु परिसरातील रस्त्यांचे कुठलीच कामे झाले नसून केवळ कागदोपत्रीच ही कामे पडून राहिल्याने बाराही महिने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी भरपूर प्रमाणात शेती पडीत राहत असल्याने शेती मशागतीचे अवजारे शेतकऱ्यांना कोठूनही नेता येत होते. परंतु कुटुंबातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण मालकीचे जमिनीचे क्षेत्र वहिती करण्यात आल्याने ते पूर्वीचे रस्ते बंद झाले आहेत. पूर्वीच्या वहिवाटीचे पांणद रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेतकऱ्यांनीच अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत.

शेतमाल अडकला रस्त्यातकिनगावजट्टू येथील शेतकरी खोटे यांच्या शेतातून सोयाबीनचा माल घरी आणण्यासाठी मालवाहू वाहन नेण्यात आले. दरम्यान, वसंतनगर शिवारातून सोयाबीनचा शेतमाल मालवाहू वाहनाने शेतातून घरी आणत असताना पाणंद रस्त्यात ते वाहन फसले. दरम्यान, दुसरे ट्रॅक्टर आणून ते वाहन काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागली.

रस्त्याला बघून ना ट्रॅक्टर येत, ना शेतमजूरकृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण झाले असल्याने पेरणीपूर्व मशागतीसह नागरणी वखरणी पेरणी कीटकनाशक फवारणी शेतीची इतर कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात. परंतु अरुंद शेत रस्ते, त्यातही पावसाळ्यात गटारे होत असल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर शेतात मशागती करिता नेण्यासाठी ट्रॅक्टर मालक तयार होत नाहीत. शेतमजूरही रस्त्याच्या त्रासामुळे शेतात येत नाहीत.