शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

वान धरण आर्थिक उत्पन्नाचे स्रोत !

By admin | Updated: December 22, 2014 00:46 IST

राजकीय, शासकीय इच्छाशक्तीची गरज : पर्यटन, शेती, व्यवसायाच्या विविध संधी.

पंजाबराव ठाकरे /संग्रामपूरनैसर्गिकदृष्ट्या तालुक्यासाठी वरदान असलेल्या वान धरणाचा नियोजनात्मक वापर होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही या भागातील शेतकर्‍यांना उपेक्षितच राहावे लागत आहे. आर्थिक उत् पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठीही हे धरण लाभदायी ठरणारे आहे. फक्त राजकीय व शासकीय इच्छाशक्तीचा वापर होणे गरजेचे ठरत आहे.बुलडाणा व अकोला जिल्हय़ाच्या सीमेवर असलेल्या वान धरणाच्या पाण्याचा संग्रामपूरसारख्या मागास तालुक्याला आतापर्यंत पाहिजे तसा लाभ झाला नाही. खारपाणपट्टा असल्याने पिण्यासाठी गोडे पाणी या धरणातून देण्यासाठी आता कुठे योजना कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. धरणाला लागून प्राचीन म्हणजे सर्मथ रामदास स्वामींच्या हस्ते हनुमान मूर्तीची स्थापना येथे करण्यात आली असून, वारीचा हनुमान म्हणून राज्यभर या ठिकाणाची ओळख आहे व भक्तही आहेत. मात्र राजकीय व शासकीय स् तरावर याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत भौगोलिक स्थिती असतानाही काहीही झाले नाही. एमटीडीसीचे निवासस्थानसुद्धा येथे आतापर्यंत निर्माण करण्यात आले नाही. किमान आता तरी यामध्ये धडाडीने कार्य होण्याची अपेक्षा आहे. याच धरणामुळे संग्रामपूर तालुक्यातील वान नदीच्या तेल्हाराकडील काठावरील गावांमध्ये पाटाच्या पाण्यामुळे रब्बी पिके घेण्याची संधी आहे. यासाठी वानखेड-उकळी कालवा पातुर्डा गावापर्यंत आहे. यामध्ये पाणीवापर संस्था निर्माण करण्यात आल्या; परंतु सिंचनाचे लाभक्षेत्र या संस्थाकडे तांत्रिकत्रृट्या राहिल्याने आजपर्यंत हस्तांतरित करण्यात आले नाही म्हणून यंदा दुष्काळी परिस्थितीत धरणात पाणी असतानाही शेतकर्‍यांना एक पाणी पिकासाठी मिळाले नाही. एका पाण्याने या भागातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असता; परंतु वान पाटबंधारे विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. सद्य:स्थितीत पाटसरीच नसल्याने दररोज लाखो लीटर पाणी वाया जात आहे. लाभ क्षेत्रातील शेतापर्यंत पाणी देण्यासाठी पाटसरी व्यवस्थित करण्याची जाबबदारी ज्या विभागाची असते त्या विभागाकडून यासाठी लाखो रुपये खर्ची घालूनही वितरण व्यवस्था शिल्लक राहिली नाही. ज्या शेतात पाटसरीने पाणी जात नाही त्या लाभधारक शेतकर्‍यांसाठी पाणी देण्याच्या हिशेबाने पाटात कूपनलिका कार्यान्वित करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला; मात्र कू पनलिकेवर वीज व मशीनचाही पत्ता नसल्याने कार्यान्वित नाहीत.