शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

पहिल्या वर्षी टीईटी उत्तीर्ण झालेल्यांची वैधता संपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:30 IST

.पहिली टीईटी ही २०१३ मध्ये घेण्यात आली होती.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : डीएड् व बीएड् झालेल्या बेरोजगारांची संख्या राज्यात लाखोंच्या घरात आहे. या भावी शिक्षकांची पात्रता तपासण्यासाठी गेल्या सात वर्षामध्ये सहावेळा टीईटी घेण्यात आली आहे. पहिल्या वर्षी टीईटी दिलेल्यांची आता मुदत संपूष्टात आलेली आहे. आतापर्यंत टीईटी निकालाचा टक्का वाढला नसून, केवळ पाच ते दहा टक्केच निकाल लागत आहे.शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी आवश्यकतेनुसार किमान एकदा घेण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्राची वैधताही सात वर्षांची असते. गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी या परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येते. मात्र टीईटी उतीर्ण झाल्यानंतर त्या उमेदवाराची पात्रता ही सात वर्षांसाठीच असते.पहिली टीईटी ही २०१३ मध्ये घेण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या वर्षी टीईटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या टीईटी प्रमाणपत्राची मुदत आता संपली आहे. टीईटीमध्ये प्राथमिक व माध्यमिक असे दोन स्तर करण्यात आले आहेत.

टीईटी धारक संभ्रमातज्या उमेदवारांनी टीईटी दिली नाही किंवा अनुत्तीर्ण झाले ते शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्र समजले जात नाहीत. त्यामुळे २०१३ मध्ये ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेवारांना नियमाप्रमाणे आता पुन्हा टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार का, याबाबत अद्याप कुठल्याच सुचना आलेल्या नाहीत. त्यामुळे टीईटीधारकही सध्या संभ्रमात आहेत. कोरोना विषाणु संसर्गामुळे सध्या टीईटी होण्याची शाश्वती कमीच आहे.

दोन्ही वर्षाचा निकाल कमीच!राज्यात सात लाखावर डीएड्, बीएड्धारक बेरोजगार आहेत. मागील वर्षी सहा लाखांवर उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी जवळपास १ लाख ६५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ३ लाख ५३ हजार पैकी १६ हजार ५९२ शिक्षक उर्त्तीण झाले आहेत.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीbuldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र