शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

पहिल्या वर्षी टीईटी उत्तीर्ण झालेल्यांची वैधता संपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:30 IST

.पहिली टीईटी ही २०१३ मध्ये घेण्यात आली होती.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : डीएड् व बीएड् झालेल्या बेरोजगारांची संख्या राज्यात लाखोंच्या घरात आहे. या भावी शिक्षकांची पात्रता तपासण्यासाठी गेल्या सात वर्षामध्ये सहावेळा टीईटी घेण्यात आली आहे. पहिल्या वर्षी टीईटी दिलेल्यांची आता मुदत संपूष्टात आलेली आहे. आतापर्यंत टीईटी निकालाचा टक्का वाढला नसून, केवळ पाच ते दहा टक्केच निकाल लागत आहे.शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी आवश्यकतेनुसार किमान एकदा घेण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्राची वैधताही सात वर्षांची असते. गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी या परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येते. मात्र टीईटी उतीर्ण झाल्यानंतर त्या उमेदवाराची पात्रता ही सात वर्षांसाठीच असते.पहिली टीईटी ही २०१३ मध्ये घेण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या वर्षी टीईटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या टीईटी प्रमाणपत्राची मुदत आता संपली आहे. टीईटीमध्ये प्राथमिक व माध्यमिक असे दोन स्तर करण्यात आले आहेत.

टीईटी धारक संभ्रमातज्या उमेदवारांनी टीईटी दिली नाही किंवा अनुत्तीर्ण झाले ते शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्र समजले जात नाहीत. त्यामुळे २०१३ मध्ये ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेवारांना नियमाप्रमाणे आता पुन्हा टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार का, याबाबत अद्याप कुठल्याच सुचना आलेल्या नाहीत. त्यामुळे टीईटीधारकही सध्या संभ्रमात आहेत. कोरोना विषाणु संसर्गामुळे सध्या टीईटी होण्याची शाश्वती कमीच आहे.

दोन्ही वर्षाचा निकाल कमीच!राज्यात सात लाखावर डीएड्, बीएड्धारक बेरोजगार आहेत. मागील वर्षी सहा लाखांवर उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी जवळपास १ लाख ६५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ३ लाख ५३ हजार पैकी १६ हजार ५९२ शिक्षक उर्त्तीण झाले आहेत.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीbuldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र