शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वीरशैवांच्या भक्ती मेळ्यात वैष्णवांचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST

साखरखेर्डा : कोरोना संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून पंढरीची वारी सलग दुसऱ्या वर्षीही झाली नाही़ पंढरीला जाता ...

साखरखेर्डा : कोरोना संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून पंढरीची वारी सलग दुसऱ्या वर्षीही झाली नाही़ पंढरीला जाता आले, नसले तरी आषाढी एकादशीला गावातील विठ्ठलाचे दर्शन घेऊन वारकरी भाविकांनी येथेच डोळे भरून पांडुरंग पाहिला. साखरखेर्डा गाव महास्वामी श्री पलसिध्द महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी असून त्यांच्याच शिष्याने साखरखेर्डा नगरीत विठ्ठल-रुख्माई यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून वीरशैवाच्या भूमीत वैष्णवांचा मेळा असेच काहीसे चित्र पाहावयास मिळते.

साखरखेर्डा गावाचा इतिहास हा पुरातन असून अनेक खाणाखुणा त्यांची साक्ष देतात. एक हजार वर्षांपूर्वीचा पलसिंध्द महाराज यांचा मठ हा त्याचा साक्षीदार आहे. वीरशैव लिंगायत संप्रदाय या गावात वतनदार म्हणून कारभार पाहात होते. गुणाप्पा सखाराम अप्पा बेंदाडे एक जमीनदार म्हणून १८व्या शतकात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या घराण्यात वीरशैव धर्म पताका जरी असली तरी ते विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. दर एकादशीला उपवास, भजन, कीर्तन असा भक्तिमय सोहळा होत होता. त्याच कालखंडात त्यांनी विठ्ठल-रुख्माईची प्राणप्रतिष्ठा करून गावातील भक्तांसाठी आपले निवासस्थान एक मंदिर म्हणून खुले केले. त्यांच्या पश्चात मार्तंड अप्पा यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालू ठेवला. पंढरपूरची वारी म्हणजे त्यांचा नित्यक्रम असायचा. तो वारसा २९व्या शतकात श्रीराम अप्पा बेंदाडे यांनी सुरू ठेवला. त्यांच्या पश्चात शामराव बेंदाडे, सुधीर अप्पा बेंदाडे आणि शशिकांत बेंदाडे यांनी सुरू ठेवून आषाढी एकादशीला महापूजा, आरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. धर्म, संप्रदाय कोणताही असला तरी भक्तिभाव असला पाहिजे, अशी प्रचिती त्यांनी दाखवून दिली. दरवर्षी आषाढी एकादशीला अख्यगाव आणि परिसरातील नागरिकांच्या भक्तिभावाने वाहून जाते. मंगळवारी शशिकांत अप्पा बेंदाडे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून खुले करण्यात आले हाेते़