शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानाचे प्रयोग वहीतच पूर्ण!

By admin | Updated: February 28, 2017 01:52 IST

आज विज्ञान दिन: प्रात्यक्षिकालाही झटकल्या जात नाही प्रयोगशाळेतील धूळ

बुलडाणा, दि. २७- दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांंना विज्ञानाच्या प्रात्यक्षिकामध्ये पास होण्याची हमी शाळा, महाविद्यालयामधून मिळत असून, अनेक शाळांमधील प्रयोगशाळेत नाशवंत साहित्याची खरेदीच होत नसल्याचे दिसून आले आहे. बहुतांश शाळा, महाविद्यालयांमध्ये विज्ञानाचे प्रयोग हे प्रयोग वहीतच पूर्ण होत आहेत. प्रयोगशाळेतील साहित्यावरील धूळ प्रात्यक्षिकालाही झटकल्या जात नसल्याचे वास्तव २७ फेब्रुवारी रोजी ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. डॉ. सी. व्ही. रामन यांच्या शोधनिबंधास २८ फेब्रुवारी रोजी नोबेल मिळाल्याच्या निमित्ताने हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळण्याची प्रथा १९८७ पासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांंमध्ये वैज्ञानिकतेची आवड निर्माण करण्यासाठी व विज्ञानाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शाळा, महाविद्यालयामध्ये विज्ञान प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली. शिक्षणात प्रात्यक्षिकावर भर दिला जावा, यासाठी दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये विज्ञानाच्या प्रयोगासाठी गुणदान ठेवण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये किमान एक प्रयोगशाळा अपेक्षित आहे, तसेच ५00 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या प्रयोगशाळेत सहायक व परिचर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळेतील साहित्य हे दोन प्रकारचे असते. त्यामध्ये स्थायी व अस्थायी असे दोन प्रकार पडत असून, यातील अस्थायी साहित्यामध्ये नाशवंत केमिकल आदींचा समावेश असतो; मात्र जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये अस्थायी वस्तूची खरेदीच होत नाही. प्रयोग न करता विद्यार्थ्यांंना गुणदान केले जात असल्याने प्रात्यक्षिकाला महत्त्व न देता लेखी परीक्षेतील गुणांनाच अधिक महत्त्व दिल्या जाते. एखाद्या विद्यार्थ्यांला लेखी परीक्षा नाही दिली, तरी पास होण्याची हमी शाळा, महाविद्यालयातून मिळत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये प्रयोगशाळा, कर्मचारी, उपकरणे यावर शासन खर्च करते; मात्र त्याचा कुठलाच उपयोग होत नसल्याचे दिसून येते. बहुतांश प्रयोगशाळेतील धूळही झटकली जात नसल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. जिल्ह्यातील काही नामवंत महाविद्यालयातदेखील बारावी परीक्षेपूर्वी महिनाभर प्रात्यक्षिक परीक्षेच्या तयारीचे केवळ सोपस्कार पूर्ण केले जातात. शाळा, महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील साहित्य धूळ खात असल्याने विज्ञान प्रात्यक्षिकांबद्दल अनास्था वाढत असल्याचे दिसून येत आहे.