शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शहरी भागात घरकुल योजनेला घरघर

By admin | Updated: November 9, 2014 23:56 IST

रमाई घरकुल योजना : बुलडाणा जिल्ह्यात केवळ २३ टक्केच उद्दिष्ट पूर्ण.

सिद्धार्थ आराख /बुलडाणा ग्रामीण भागापाठोपाठ शहरी भागातही रमाई घरकुल योजनेला घरघर लागली आहे. बुलडाणा जिल्ह्याला ३५१ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र चार वर्षात १५२ घरे पूर्ण करण्यात आले. म्हणजे जिल्ह्यात केवळ २३ टक्केच उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे शहरी भागातही रमाई आवास घरकुल योजना राबविली जाते. या योजनेला सामाजिक न्याय विभाग निधी उपलब्ध करून देते. तर नगरपालिका एजन्सी म्हणून काम करते. मागील सन २0११ ते २0१४ या चार वर्षात बुलडाणा जिल्ह्यातील काही निवडक नगरपालिकांना रमाई घरकुल आवास योजनेचे ३५१ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी ३ कोटी १0 लाख ५0 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करून देण्यात आली होती; मात्र पालिकांनी चार वर्षात केवळ १५२ घरे बांधली. सन २0१0-११ आणि २0११- १२ या दोन वर्षात १७१ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यावर ३ कोटी ५0 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. पैकी या दोन वर्षात १५२ घरेच पूर्ण करण्यात आली. निवड झालेल्या १७१ लाभार्थ्यांना १ कोटी ६८ लाख रुपये वाटप करण्यात आले. हे उद्दिष्ट केवळ २३ टक्के एवढेच आहे. सन २0१३-१४ मध्ये १८0 घराचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र या दोन वर्षात एकही घर पूर्ण झाले नसल्याचे सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या अहवालात म्हटले आहे. म्हणजे सन २0१२-१३ आणि १३-१४ या दोन वर्षातील १८0 घरे आणि सन २0१0-११ आणि ११-१२ या दोन वर्षातील अपूर्ण ५५ घरे असे २३५ घरे नगरपालिकांनी बांधली नाहीत. त्यामुळे २ कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे. तर २३५ लाभार्थी घरकुलांपासून वंचित राहिले. *पालिकांनी निधी वळविलानगरपालिकांमध्ये असलेला राजकीय हस्तक्षेप आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांचे दुर्लक्ष यामुळे रमाई घरकुल योजनेसाठी आलेला निधी अनेक नगरपालिकांनी इतर विकास कामाकडे वळता केल्याने शासनाच्या या योजनेला खीळ बसली आहे. दुसरीकडे सदर योजनेची कामे करून घेण्यास सामाजिक न्याय विभागाही कमी पडला. त्यामुळे शासनाच्या या चांगल्या योजनेपासून लाभा र्थी वंचित राहिले.*निधी आहे; पण लाभार्थी वंचित लोणार येथील दारिद्रय़रेषेखालील घटकांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी पाच वर्षांपासून घरकुलां पासून वंचित आहेत. या योजनेंतर्गत न.प.ला प्राप्त निधी पडून आहे. सन २0१0-११ आणि २0११-१२ मध्ये शहरातील दारिद्रय़रेषेखालील घटकांसाठी रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा, याकरिता न.प.कडून १0 प्रस्ताव पाठविण्यात आले होते. न.प.कडून पाठविलेले हे प्रस्ताव मंजूर करून घरकुलाच्या बांधकामासाठी १५ लाख रुपयांचा निधी नगरपालिकेला प्राप्तही झाला. मंजूर दहा प्रस्तावांपैकी ७ लाभार्थी हे सरोवरापासून ५00 आणि पुरातन वास्तूपासून १00 मीटरच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास आहे. त्यामुळे घरकुल मंजूर होऊनही हे लाभार्थी घरकुलांपासून वंचित आहेत.