शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीचा ५७ गावांना फटका; दीड हजार हेक्टरवर नुकसान

By ब्रह्मानंद जाधव | Updated: April 28, 2023 13:22 IST

कांदा, भाजीपाला पिकांसह फळबागांवर संकट

बुलढाणा : जिल्ह्यात दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या अवकाळीचा ५७ गावांना फटका बसला आहे. यामध्ये कांदा उन्हाळी, मूग, भूईमूंग, भाजीपाला पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. 

दिवसभर उन्हाचा कडाक आणि सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. बुलढाणा, चिखली, मेहकर, मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा या तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपिटीने झोडपले. सध्या शेतात भाजीपाला वर्गीय पिकांसह कांदा, बिजोत्पादनाचा कांदा, उन्हाळी मूग, भूईमूंग व फळबाग आहेत. या पिकांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. काही भागात मका पिकही भूईसपाट झाले आहे.

असे झाले नुकसान

जिल्ह्यात २५ व २६ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. चिखली तालुक्यात ९१.८० हेक्टर क्षेत्रावरील कांदा उन्हाळी मुग, भुईमूग, भाजीपाला, टरबूज, खरबूज या पिकांचे नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यात २९७ हेक्टर क्षेत्रावरील मका, कांदा व फळबागांचे नुकसान झाले. मलकापूर तालुक्यात ०.८० हेक्टर क्षेत्रावरील मका, कांदा खामगाव तालुक्यातील कांदा, उन्हाळी मुंग, भूईमूग, भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकांना फटका बसला. शेगाव तालुक्यात ०.६० हेक्टरील फळबागा आणि नांदुरा तालुक्यात २ हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी ज्वारीचे नुकसान झाले.

कोणत्या तालुक्यातील किती गावांचे नुकसानतालुका गावेचिखली : ०८मोताळा : १६मलकापूर : ०१खामगाव : ३०शेगाव : ०१नांदुरा : ०१

टॅग्स :buldhanaबुलडाणा