शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:38 IST

हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भाजप सरकारने सिएसआरची मदत घेत ग्राम सामाजिक परिवर्तन हे अभियान राबविण्यास सुरवात केली होती. राज्यातील २५ जिल्ह्यामध्ये अनेक गावांचा कायापालट करण्यास अभियानाला यशही आले. मात्र अचानक हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे.महाराष्ट्रातील मुंबईसह पश्चिम भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असला तरी विदर्भ, मराठवाडा व कोकण या भागातील ग्रामीण व आदिवासी भागात अजूनही विकासाच्या बाबतीत अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन व विविध शासकीय व निमशासकीय संस्था या भागांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. परंतू, अद्यापही शासनाच्या कल्याणकारी योजना दुर्गम व अतिमागास क्षेत्रात राहणाºया शेवटच्या घटकांपर्यंत पोचवितांना शासनाला अडचणी येत असल्याने महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रातील अग्रणी असलेल्या कंपन्या जसे, एच.यु.एल., एच.टी. पारेख, महिन्द्रा, रिलायन्स, टाटा ट्रस्ट इ. या सारख्या कंपन्या सामाजिक दायित्व प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य, पोषण, कृषी, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा कंपन्यांच्या भागीदारीतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शाश्वत विकासाचे मॉडेल तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि कॉपोर्रेट कंपन्यांसोबत आॅगस्ट २०१६ मध्ये पहिली बैठक झाली. त्यातुनच निर्माण झालेल्या ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून राज्यातील १००० अतिमागास गावांची निवड झाली. याठिकाणी उच्चशिक्षित ग्राम परिवर्तकांवर सामाजिक-आर्थिक विकासाला चालना व गती देण्यावर भर देण्यात आला. बुलडाणा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्याप्रमाणेच २५ जिल्हयाातील ठरावीक गावात पायाभूत सुविधा, रोजगार, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला. हे अभियान बंद होत असल्याने ३४ जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक जणावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावाअमरावती विभागातील कार्याचा आढावा घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विभागीय आयुक्तांच्या दालनात महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्राम परिवर्तकांनी केलेल्या कामाचा व प्रलंबीत कामाचा आढावा घेण्यात आला होता. चार वर्षापासून अविरतपणे विकासाची धुरा सांभाळणाºया उच्चशिक्षीत ग्राम परिवर्तकांना अचानक नोकरी जाण्याचा धक्का बसला आहे. तुर्तास ३१ मार्च पर्यंत अभियान सुरु राहणार आहे. मात्र पुढे अभियानाचे काय होईल हे काहीही सांगता येणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा