शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:38 IST

हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भाजप सरकारने सिएसआरची मदत घेत ग्राम सामाजिक परिवर्तन हे अभियान राबविण्यास सुरवात केली होती. राज्यातील २५ जिल्ह्यामध्ये अनेक गावांचा कायापालट करण्यास अभियानाला यशही आले. मात्र अचानक हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे.महाराष्ट्रातील मुंबईसह पश्चिम भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असला तरी विदर्भ, मराठवाडा व कोकण या भागातील ग्रामीण व आदिवासी भागात अजूनही विकासाच्या बाबतीत अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन व विविध शासकीय व निमशासकीय संस्था या भागांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. परंतू, अद्यापही शासनाच्या कल्याणकारी योजना दुर्गम व अतिमागास क्षेत्रात राहणाºया शेवटच्या घटकांपर्यंत पोचवितांना शासनाला अडचणी येत असल्याने महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रातील अग्रणी असलेल्या कंपन्या जसे, एच.यु.एल., एच.टी. पारेख, महिन्द्रा, रिलायन्स, टाटा ट्रस्ट इ. या सारख्या कंपन्या सामाजिक दायित्व प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य, पोषण, कृषी, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा कंपन्यांच्या भागीदारीतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शाश्वत विकासाचे मॉडेल तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि कॉपोर्रेट कंपन्यांसोबत आॅगस्ट २०१६ मध्ये पहिली बैठक झाली. त्यातुनच निर्माण झालेल्या ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून राज्यातील १००० अतिमागास गावांची निवड झाली. याठिकाणी उच्चशिक्षित ग्राम परिवर्तकांवर सामाजिक-आर्थिक विकासाला चालना व गती देण्यावर भर देण्यात आला. बुलडाणा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्याप्रमाणेच २५ जिल्हयाातील ठरावीक गावात पायाभूत सुविधा, रोजगार, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला. हे अभियान बंद होत असल्याने ३४ जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक जणावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावाअमरावती विभागातील कार्याचा आढावा घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विभागीय आयुक्तांच्या दालनात महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्राम परिवर्तकांनी केलेल्या कामाचा व प्रलंबीत कामाचा आढावा घेण्यात आला होता. चार वर्षापासून अविरतपणे विकासाची धुरा सांभाळणाºया उच्चशिक्षीत ग्राम परिवर्तकांना अचानक नोकरी जाण्याचा धक्का बसला आहे. तुर्तास ३१ मार्च पर्यंत अभियान सुरु राहणार आहे. मात्र पुढे अभियानाचे काय होईल हे काहीही सांगता येणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा