शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
5
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
8
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
9
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
10
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
11
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
12
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
14
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
15
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
16
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
17
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
18
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
19
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
20
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:38 IST

हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भाजप सरकारने सिएसआरची मदत घेत ग्राम सामाजिक परिवर्तन हे अभियान राबविण्यास सुरवात केली होती. राज्यातील २५ जिल्ह्यामध्ये अनेक गावांचा कायापालट करण्यास अभियानाला यशही आले. मात्र अचानक हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे.महाराष्ट्रातील मुंबईसह पश्चिम भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असला तरी विदर्भ, मराठवाडा व कोकण या भागातील ग्रामीण व आदिवासी भागात अजूनही विकासाच्या बाबतीत अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन व विविध शासकीय व निमशासकीय संस्था या भागांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. परंतू, अद्यापही शासनाच्या कल्याणकारी योजना दुर्गम व अतिमागास क्षेत्रात राहणाºया शेवटच्या घटकांपर्यंत पोचवितांना शासनाला अडचणी येत असल्याने महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रातील अग्रणी असलेल्या कंपन्या जसे, एच.यु.एल., एच.टी. पारेख, महिन्द्रा, रिलायन्स, टाटा ट्रस्ट इ. या सारख्या कंपन्या सामाजिक दायित्व प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य, पोषण, कृषी, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा कंपन्यांच्या भागीदारीतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शाश्वत विकासाचे मॉडेल तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि कॉपोर्रेट कंपन्यांसोबत आॅगस्ट २०१६ मध्ये पहिली बैठक झाली. त्यातुनच निर्माण झालेल्या ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून राज्यातील १००० अतिमागास गावांची निवड झाली. याठिकाणी उच्चशिक्षित ग्राम परिवर्तकांवर सामाजिक-आर्थिक विकासाला चालना व गती देण्यावर भर देण्यात आला. बुलडाणा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्याप्रमाणेच २५ जिल्हयाातील ठरावीक गावात पायाभूत सुविधा, रोजगार, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला. हे अभियान बंद होत असल्याने ३४ जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक जणावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावाअमरावती विभागातील कार्याचा आढावा घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विभागीय आयुक्तांच्या दालनात महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्राम परिवर्तकांनी केलेल्या कामाचा व प्रलंबीत कामाचा आढावा घेण्यात आला होता. चार वर्षापासून अविरतपणे विकासाची धुरा सांभाळणाºया उच्चशिक्षीत ग्राम परिवर्तकांना अचानक नोकरी जाण्याचा धक्का बसला आहे. तुर्तास ३१ मार्च पर्यंत अभियान सुरु राहणार आहे. मात्र पुढे अभियानाचे काय होईल हे काहीही सांगता येणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा