शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शिक्षकांच्या पाल्यांसाठीचा नि:शुल्क शिक्षणाचा आदेश पुर्ववत लागू करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST

महाराष्ट्र शासनाने १६ मार्च २०२१ ला काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील अनुदानित अशासकीय माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ...

महाराष्ट्र शासनाने १६ मार्च २०२१ ला काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील अनुदानित अशासकीय माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर विहित दराने अर्थसाहाय्य करण्याबाबतच्या घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. या आदेशामध्ये पूर्वीच्या आदेशातील ‘नि:शुल्क’ किंवा ‘मोफत शिक्षण’ या शीर्षकाऐवजी विहित दराने अर्थसाहाय्य असा बदल केलेला आहे. त्यानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पूर्ण शुल्काच्या मोबदल्यात नाममात्र वार्षिक ३ ते ८ हजार रुपये इतक्या नाममात्र दराने अर्थसाहाय्य मिळण्याची तरतूद आहे. शासन आदेशात १९९५ च्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्य:स्थितीत अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाबरोबरच अन्य शिक्षणाचे प्रवेश शुल्कसुद्धा महागले आहे. नवीन आदेशामुळे पूर्ण शुल्क माफ होण्याऐवजी ३ ते ८ हजार रुपये इतका नाममात्र परतावा मिळणार आहे. या आदेशामुळे शिक्षकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे स्पष्ट करीत १९ ऑगस्ट १९९५ चा नि:शुल्क किंवा मोफत शिक्षण असा उल्लेख असलेला शासन आदेश पूर्ववत लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ठाकरे व शिक्षणमंत्री ना. गायकवाड यांच्याकडे केली आहे.

शिक्षकांच्या पाल्यांच्या शिक्षणात बाधा निर्माण करणारा आदेश -प्राचार्य डॉ. गावंडे

१९९५ च्या नि:शुल्क किंवा मोफत शिक्षणाच्या आदेशामध्ये दुरुस्ती करताना शासनाने ‘विहित दराने’ असा शब्दप्रयोग केला. त्यामुळे शिक्षकांची आर्थिक घडी पूर्णत: विस्कटणार आहे. शासनाकडून मिळणारा परतावा अत्यल्प आहे. शासनाचा हा आदेश म्हणजे खाजगी अनुदानित शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा एक प्रकारचा छळच असल्याचे मत डॉ. गावंडे यांनी व्यक्त केले आहे.