शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

जल जीवन मिशनअंतर्गत १२५५ गावांचे कृती आराखडे तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत नळजोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट सध्या हाती घेण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्राधान्याने ...

जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत नळजोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट सध्या हाती घेण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्राधान्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्तरावर गाव कृती आराखडा तयार करण्याच्या या प्रक्रियेत गावांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांनी केले आहे.

दरम्यान, या पंधरवड्यांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता आणि जिल्हा कक्षाचे सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना ऑनलाइन गाव कृती आराखडे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात माहिती संकलन, राबविण्याच्या प्रक्रियेसह अन्य बाबींची माहिती व प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार, तालुकास्तरीय गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व संबंधितांनाही दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासोबतच २८ व २९ जुलै रोजी ग्रामपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर्स, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या दोन प्रतिनिधींनाही प्रशिक्षण दिले जाईल.

- मान्यतेसाठी ग्रामसभेत ठेवणार

स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये बनविण्यात आलेले हे गाव कृती आराखडे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे यासंदर्भातील कामांना प्राधान्य दिले जावे. सोबतच मधल्या काळात या कृती आराखड्यांची पडताळणीही करण्यात येणार आहे. त्यामुळे या अभियानात ग्रामस्तरावरून मोठा सहभाग असणे आवश्यक असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.