शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय समितीद्वारे होणार मूल्यांकन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:14 IST

चिखली : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२0१८’ कार्यक्रमाला शहरात सुरुवात झाली आहे. त्यानुसार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली असून, या अभियानाची यशस्वीता ही नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असल्याने शहरवासीयांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देस्वच्छ चिखलीसाठी पालिका प्रशासन प्रयत्नरत

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२0१८’ कार्यक्रमाला शहरात सुरुवात झाली आहे. त्यानुसार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली असून, या अभियानाची यशस्वीता ही नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असल्याने शहरवासीयांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.केंद्र सरकारने देशभरातील सर्व शहरे आणि गावांचे स्वच्छतेच्यादृष्टीने मूल्यांकन करण्यासाठी ३१ जुलै २0१७ रोजी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२0१८’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अभियानात सहभागी चिखली शहराचे स्वच्छतेबाबत लवकरच मूल्यांकन होणार असून, शहरातील स्वच्छतेची पाहणी एका समितीद्वारे होणार आहे. या पृष्ठभूमीवर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केल्या जात आहेत. यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार असून, पाहणीसाठी येणार्‍या समितीद्वारे नागरिकांची मते जाणून घेतली जाणार असल्याने पालिका प्रशासनाने चिखली शहर स्वच्छ व सुंदर असल्याचा दावा करीत या सर्वेक्षणांतर्गत विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना शहरवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाहणीसाठी येणार समितीद्वारे शहराच्या स्वच्छतेबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांबाबतही पालिका प्रशासनाने खुलासा केला असून, या प्रश्नावलीनुसार आपले चिखली शहर या स्पर्धेत सहभागी असल्याची माहिती आपणास आहे का, मागील वर्षाच्या तुलनेत आपले शहर हे स्वच्छ आहे का, सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कचराकुंडीचा वापर आपण करता का, घराघरांतून ओला व सुका कचरा वेगवेगळया डब्यांमधून गोळा करण्याच्या व्यवस्थेबाबत आपण समाधानी आहात का, मागील वर्षाच्या तुलनेत शहरातील शौचालयाचे आणि मुतारीचे प्रमाण वाढलेले आहे का, शहरातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ आहेत का, आदी प्रश्न नागरीकांना विचारल्या जाणार असल्याने या प्रश्नांना नागरिकांनी सर्मपक उत्तरे देऊन पालिका प्रशासनास सहकार्य करावे, या हेतूने पालिका प्रशानाकडून नागरिकांना या प्रश्नावलीसोबतच पालिकेस अपेक्षित उत्तरांचा सोशल मीडियाद्वारे प्रसार करण्यासह या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले जात आहे. 

मोबाइल अँपद्वारे करा स्वच्छतेच्या तक्रारीचिखली नगर परिषदेच्या आरोग्य सेवाविषयक (साफसफाई) काही तक्रारी नोंदवायच्या असल्यास शासनाच्यावतीने तयार करण्यात आलेले मोबाइल अप्लिकेशन चिखली नगर परिषदेने अंगीकृत केलेले आहे. या मोबाइल अँपचा वापर शहरवासीयांनी करावा व स्वच्छताविषयक कोणतीही तक्रार असल्यास या मोबाइल अँपच्या माध्यमाने ‘रियल टाइम डाटा’, फोटो कॉपीसह तक्रार नोंदविल्यास तक्रारीचे तत्काळ समाधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न आरोग्य विभाग नगर परिषद चिखलीद्वारे केला जाईल, अशी ग्वाही मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे.

जनतेने सहकार्य करावे -प्रिया बोंद्रेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत सुंदर भारताचे स्वप्नपूर्तीसाठी स्वच्छता अभियानांतर्गत शासकीय, निमशासकीय, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असून, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी तसेच शहर स्वच्छतेत देशपातळीवर शहराचा नावलौकिक वाढावा, यासाठी नगर परिषद राबवित असलेल्या स्वच्छता अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासह सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे यांनी केले आहे.

टॅग्स :chikhali roadचिखली रोडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान