शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

कृषी पंप वीज जोडणीचे दोन हजार प्रस्ताव प्रलंबित!

By admin | Updated: April 18, 2017 00:44 IST

पंधरा उपविभागातील स्थिती: खरीप हंगाम प्रभावित होण्याची शक्यता

नीलेश शहाकार - बुलडाणामान्सूनपूर्व वीज जोडणी व दुरुस्तीची कामे १५ दिवसांत पूर्ण करा, असे आदेश महावितरणला राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिले. शेतकरी खरीप पेरणीच्या उंबरठ्यावर असताना जिल्ह्यात कृषी पंप वीज जोडणीचे २२६४ प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्णत: पावसावर अवलंबून असला तरी ऐनवेळी पावसाने पाठ फिरवली की, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपाचा आधार द्यावा लागतो. शिवाय शेताच्या मशागतीसाठीसुद्धा वीज आवश्यक आहे.जिल्ह्याचा खरीप हंगामपूर्व नियोजन आराखडा १३ एप्रिल रोजी सादर करण्यात आला. यानुसार जिल्ह्यातील पंधरा उपविभागात २ हजार २६२ कृषी पंप वीज जोडणी अर्ज प्रलंबित असल्याची बाब पुढे आली. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ९ हजार ३०३ शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी महावितरण कार्यालयाकडे अर्ज केले होते. मार्च २०१७ अखेरपर्यंत ७ हजार अर्जाबाबत कार्यवाही करण्यात आली, तर इतर अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत.विभागात २१ हजार अर्ज प्रलंबितगत पाच वर्षांपासून विदर्भातील शेतकरी दृष्टचक्रात अडकला आहे. यातून सोडविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे; मात्र त्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील कृषी पंप वीज जोडणीचे प्रलंबित अर्जाची संख्या २१ हजार २५९ एवढी आहे़