शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

कृषी पंप वीज जोडणीचे दोन हजार प्रस्ताव प्रलंबित!

By admin | Updated: April 18, 2017 00:44 IST

पंधरा उपविभागातील स्थिती: खरीप हंगाम प्रभावित होण्याची शक्यता

नीलेश शहाकार - बुलडाणामान्सूनपूर्व वीज जोडणी व दुरुस्तीची कामे १५ दिवसांत पूर्ण करा, असे आदेश महावितरणला राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिले. शेतकरी खरीप पेरणीच्या उंबरठ्यावर असताना जिल्ह्यात कृषी पंप वीज जोडणीचे २२६४ प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्णत: पावसावर अवलंबून असला तरी ऐनवेळी पावसाने पाठ फिरवली की, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपाचा आधार द्यावा लागतो. शिवाय शेताच्या मशागतीसाठीसुद्धा वीज आवश्यक आहे.जिल्ह्याचा खरीप हंगामपूर्व नियोजन आराखडा १३ एप्रिल रोजी सादर करण्यात आला. यानुसार जिल्ह्यातील पंधरा उपविभागात २ हजार २६२ कृषी पंप वीज जोडणी अर्ज प्रलंबित असल्याची बाब पुढे आली. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ९ हजार ३०३ शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी महावितरण कार्यालयाकडे अर्ज केले होते. मार्च २०१७ अखेरपर्यंत ७ हजार अर्जाबाबत कार्यवाही करण्यात आली, तर इतर अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत.विभागात २१ हजार अर्ज प्रलंबितगत पाच वर्षांपासून विदर्भातील शेतकरी दृष्टचक्रात अडकला आहे. यातून सोडविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे; मात्र त्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील कृषी पंप वीज जोडणीचे प्रलंबित अर्जाची संख्या २१ हजार २५९ एवढी आहे़