शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सुक्ष्म सिंचन अनुदानापासून दोन हजार शेतकरी वंचित

By admin | Updated: November 23, 2014 00:01 IST

बुलडाणा तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित; सुक्ष्म सिंचन योजनाचे २ कोटी ८४ लाख ६९ हजाराचे अनुदान रखडले.

धाड (बुलडाणा): सततच्या अस्मानी संकटाने होरपळलेल्या, शे तकर्‍यांना, सुलतानी संकटाने हवालदिल केले असून शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याऐवजी ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्याचा प्रत्यय बुलडाणा तालुक्यात येत असून कृषी विभागातर्फे वाटप होणार्‍या सुक्ष्म सिंचन योजनेचे २ कोटी ८४ लाख ६९ हजाराचे अनुदान सन २0१२ पासून रखडले आहे. सदरचे अनुदान अद्यापपर्यंंंत शेतकर्‍यांना मिळाले नसल्याने बुलडाणा तालुक्यातील १ हजार ९२८ शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.शासनाचे काम बारा महिने थांब ही ग्रामीण भागातील म्हण सार्थ ठरवत, उलट गेल्या २४ महिन्यापासून शेतकर्‍यांचे शासकीय अनुदान लालफीतशाहीत अडकून पडले आहे. सततच्या दुष्काळाने शेतकरी हैराण आहे. जमिनीतील पाणीपातळी खोल जात आहे. आगामी काळात सिंचनाचा प्रश्न गंभीर होणार म्हणून पाण्याची बचत होऊन कृषी उत्पन्न हाती येण्यासाठी शासनाने विदर्भ सधन सिंचन योजना सुरू केली, त्याअंतर्गत ठिबक संच व तुषार संच खरेदीवर शेतकर्‍यांना क्षेत्राप्रमाणे ५0 टक्के ते ७५ टक्के अनुदानाची सोय करुन दिली.गेल्या २0१२ पासून बुलडाणा तालुक्यातील शेतकर्‍यांनी आजवर १५८0 हेक्टरवर, ठिबक आणि तुषार सिंचन संच बसवून घेतले व त्याकरिता आवश्यक असणारी सर्व रक्कम शेतकर्‍यांनी कर्जाऊ घेऊन भरणा केली. मुळात तात्काळ स्वरुपात शेतकर्‍यांना त्यांचे अनुदान थेट त्यांचे बँक खात्यात जमा होणे आवश्यक असताना केवळ शासनाच्या दप्तर दिरंगाईने अजुनही शेतकर्‍यांना त्यांचे अनुदान प्राप्त झालेले नाही.बुलडाणा तालुक्यात ठिबक संचाचे एकूण २५१ शेतकर्‍यांचे अनुदान प्रस्ताव तर तुषार संचाचे एकूण १६७७ शेतकर्‍यांचे अनुदान प्रस्ताव २0१२ पासून कृषी विभाग बुलडाणा यांचेकडे प्रलंबित आहेत.कृषी अधिकारी कार्यालयातर्फे वरीष्ठ पातळीवर अनुदानाची मागणी केली आहे. मात्र अजुनही निधी प्राप्त नाही. निधी आल्यास शेतकर्‍यांना अनुदान वाटप होणार असल्याची माहीती कृषी अधिकारी बी.टी. हिवाळे यांनी दिली.