शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

जिल्ह्यातील दोन शेतकरी राज्य कृषी पुरस्काराने सन्मानित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST

२०१९ सालच्या 'कृषिभूषण सेंद्रिय शेती' पुरस्कारावर चिखली तालुक्यातील मंगरूळ ईसरूळ येथील शेतकरी प्रल्हाद संपत गवते तर 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ ...

२०१९ सालच्या 'कृषिभूषण सेंद्रिय शेती' पुरस्कारावर चिखली तालुक्यातील मंगरूळ ईसरूळ येथील शेतकरी प्रल्हाद संपत गवते तर 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कारावर तालुक्यातील मलगी येथील अनिता रामसिंग पवार यांनी मोहर उमटविली आहे. विशेष म्हणजे राज्यस्तरावरील दोन पुरस्कार बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले असून, हे दोन्ही शेतकरी चिखली तालुक्यातील असल्याने कृषी क्षेत्रात बुलडाणा जिल्ह्यास चिखलीचा गौरव वाढला आहे. या दोन्ही शेतकऱ्यांना ३१ मार्च रोजी जिल्हा परिषद बुलडाणा येथे कृषी विषय समितीच्या वतीने सभापती राजेंद्र पळसकर, कृषी विकास अधिकारी अनिता महाबळे, कृषी विषय समितीचे सदस्य बुधवत, गवई, मोरे, सौदागर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मोहीम अधिकारी खोदील, कृषी अधिकारी पाटील, कृषी उपसंचालक बेतवार लाहरे, चिखली तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, कृषी अधिकारी संदीप सोनुने, मंडळ अधिकारी अंभोरे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक खारोळे उपस्थित होते.

प्रल्हाद गवते यांचा सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार !

प्रल्हाद गवते यांनी सेंद्रिय गटाची स्थापना करून कमी खर्चामध्ये दर्जेदार सेंद्रिय उत्पादन घेत आहेत. सुरुवातीला ५० शेतकऱ्यांचा गट स्थापन करून गटातील शेतकऱ्यांनी प्रत्येकी एका एकरात सेंद्रिय पद्धतीने कडधान्य व गहू उत्पादन घेतले. गहू बियाणे म्हणून थेट उत्तराखंडमध्ये मागविण्यात येतो. सद्य:स्थितीत ५० सदस्यांचे एकूण चार गटांमार्फत या भागात सेंद्रिय शेती होत आहे.

अनिता पवार यांनी खडकाळ माळरानावर फुलविली फळबाग !

मलगी येथील अनिता रामसिंग पवार यांनी खडकाळ माळरानावर शेततळ्याच्या साहाय्याने कमी पाण्यात व कमी खर्चाच्या फळपिकांची निवड करून फळबाग फुलविली. शेतकरी अनिता पवार यांनी सीताफळ, बोर, लिंबू, पपई या फळपिकातून भरघोस उत्पादन घेऊन नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या शेतातील सीताफळास 'महासीताफळ' या नावाने मागणी असते.