शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दोन दिवसात तूर खरेदी केंद्र सुरु होणार

By admin | Updated: May 2, 2017 23:48 IST

शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करू: तहसीलदार काकडे यांची माहिती

मेहकर : नाफेडमार्फत खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा तसेच तुरीचा बारदाना नसल्याने मेहकर येथील तूर खरेदी केंद्र काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसात मेहकर येथील तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे तहसीलदार संतोष काकडे यांनी सांगितले. १ मे रोजी नाफेड अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ व महसूल अधिकारी यांची तहसील कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार संतोष काकडे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करीत होते. शेतकऱ्यांची खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने तसेच बारदाना नसल्याने गेल्या काही दिवसांपासून तूर खरेदी केंद्र बंद आहे. त्यामुळे शेतकरी परेशान झाले आहेत. जवळपास १९ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप करणे अजूनही बाकी आहे, तर खरेदी केलेली तूर ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात उघड्यावर ठेवण्यात आली आहे. तूर खरेदी केंद्र लवकर सुरु व्हावे, यासाठी सर्व स्तरातून मागणी होत आहे. मेहकर येथील खरेदी केलेली तूर आज व उद्या उचलून खामगाव येथे साठविण्यात यावी, तसेच उर्वरित तूर खरेदी करून त्याचे तत्काळ मोजमाप करावे, अशा सूचना तहसीलदार काकडे यांनी यावेळी दिल्या. तूर खरेदी ही २४ तास सुरू ठेवणे शक्य नाही, त्यामुळे सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंतच तूर खरेदी केंद्र सुरु ठेवावे, नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर गर्दी होऊन गोंधळ होत आहे. यामुळे वाद-विवादसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे यापुढे तुरीचे मोजमाप हे पोलीस बंदोबस्तात करण्यात यावे, अशा सूचनाही तहसीलदार संतोष काकडे यांनी दिल्या आहेत. नाफेडचे तूर खेरदी केंद्रांवर खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने उघड्यावर अथवा मार्केट यार्डात तूर ठेवावी लागत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने खरेदी केलेली तूर लवकर न उचलल्यास तुरीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे खरेदी-विक्री संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.सातबाराची खात्री करुनच मोजमाप करावेनाफेडच्या केंद्रावर काही व्यापारी शेतकऱ्यांची तूर बाहेर कमी भावात खरेदी करुन तीच तूर नाफेड केंद्रावर जादा भावाने विकत असल्याच्या तक्रारी येत असल्याने ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांचा सात-बारा असल्याची खात्री करुन प्रत्यक्ष शेतकरी हजर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तूर माल, सात-बारा, उत्पादन क्षमता पडताळून घेऊनच तुरीचे मोजमाप करावे, अशा सूचना तहसीलदार संतोष काकडे यांनी दिल्या.