शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

अडीच लाख केशरी कार्डधारकांना फटका

By admin | Updated: July 22, 2015 23:37 IST

अन्न सुरक्षा योजनेतील गरिबांचे धान्य केले बंद; जिल्ह्यातील २ लाखावर केशरी कार्डधारकांना फटका.

बुलडाणा : अन्न सुरक्षा योजनेत समावेश न करण्यात आलेल्या राज्यातील तब्बल पावणेदोन कोटी केशरी कार्डधारक गरीब नागरिकांचे रेशनचे धान्य राज्य सरकारने बंद केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार केशरी कार्डधारकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून केशरी कार्डधारक नागरिकांना रेशन दुकानातून माफक दरात गहू, तांदूळ मिळालेले नाही. एकीकडे महागाई व साठेबाजीमुळे धान्याचे भाव वाढत आहेत. आता नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. असे असताना राज्य सरकारने आपल्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी गरिबांचे धान्य बंद करून त्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न केला आहे. बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्येत २८ लाख एवढी असताना यापैकी १५ लाख ४0 हजार नागरिक अन्न सुरक्षा योजनेत सहभागी करण्यात आले होते. या नागरिकांना दोन रुपये किलो प्रमाणे गहू व तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ दिला जातो तसेच स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणारे जिल्ह्यात २ लाख ६६ हजार ९२८ हे एपीएल म्हणजे केशरी कार्डधारक आहेत. या केशरी कार्डधारक (एपीएल) नागरिकांनाही स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने गहू व तांदूळ असे एकूण १५ किलो धान्य देण्याची योजना सुरू केली होती; मात्र यामुळे शासकीय तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याचे कारण पुढे करून केशरी कार्डधारकांना मिळणारे रेशनचे धान्य बंद करण्यात आले आहे. गत काही महिन्यांपासून केशरकार्डधारकांना धान्यवाटप बंद आहे. शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयाबाबत अद्यापही आदेश प्राप्त झालेला नाही. पुरवठा विभागाकडून आदेश प्राप्त होताच त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी पी. के. सुरडकर यांनी स्पष्ट केले. आर्थिक ताण वाढणार शासकीय त्रुटींमुळे अनेक नागरिकांचा बीपीएलमध्ये व अन्न सुरक्षा योजनेत समावेश होऊ शकलेला नाही, अशा केशरी कार्डधारक (एपीएल) नागरिकांनाही स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने ७.२0 रुपये प्रतिकिलो दराने १0 किलो गहू व ९.६0 रुपये प्रतिकिलो दराने पाच किलो तांदूळ असे एकूण १५ किलो धान्य देण्याची योजना सुरू केली होती. स्वस्त दरात मिळणार्‍या या धान्यामुळे एका कुटुंबाचा महिनाभराचा धान्यावरील खर्च कमी होऊन इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तोच पैसा कामी येत होता. शासनाच्या या निर्णयामुळे आता केशरी कार्डधारक कुटुंबांचा आर्थिक ताण वाढणार आहे.