शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

अडीच लाख केशरी कार्डधारकांना फटका

By admin | Updated: July 22, 2015 23:37 IST

अन्न सुरक्षा योजनेतील गरिबांचे धान्य केले बंद; जिल्ह्यातील २ लाखावर केशरी कार्डधारकांना फटका.

बुलडाणा : अन्न सुरक्षा योजनेत समावेश न करण्यात आलेल्या राज्यातील तब्बल पावणेदोन कोटी केशरी कार्डधारक गरीब नागरिकांचे रेशनचे धान्य राज्य सरकारने बंद केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार केशरी कार्डधारकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून केशरी कार्डधारक नागरिकांना रेशन दुकानातून माफक दरात गहू, तांदूळ मिळालेले नाही. एकीकडे महागाई व साठेबाजीमुळे धान्याचे भाव वाढत आहेत. आता नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. असे असताना राज्य सरकारने आपल्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी गरिबांचे धान्य बंद करून त्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न केला आहे. बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्येत २८ लाख एवढी असताना यापैकी १५ लाख ४0 हजार नागरिक अन्न सुरक्षा योजनेत सहभागी करण्यात आले होते. या नागरिकांना दोन रुपये किलो प्रमाणे गहू व तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ दिला जातो तसेच स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणारे जिल्ह्यात २ लाख ६६ हजार ९२८ हे एपीएल म्हणजे केशरी कार्डधारक आहेत. या केशरी कार्डधारक (एपीएल) नागरिकांनाही स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने गहू व तांदूळ असे एकूण १५ किलो धान्य देण्याची योजना सुरू केली होती; मात्र यामुळे शासकीय तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याचे कारण पुढे करून केशरी कार्डधारकांना मिळणारे रेशनचे धान्य बंद करण्यात आले आहे. गत काही महिन्यांपासून केशरकार्डधारकांना धान्यवाटप बंद आहे. शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयाबाबत अद्यापही आदेश प्राप्त झालेला नाही. पुरवठा विभागाकडून आदेश प्राप्त होताच त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी पी. के. सुरडकर यांनी स्पष्ट केले. आर्थिक ताण वाढणार शासकीय त्रुटींमुळे अनेक नागरिकांचा बीपीएलमध्ये व अन्न सुरक्षा योजनेत समावेश होऊ शकलेला नाही, अशा केशरी कार्डधारक (एपीएल) नागरिकांनाही स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने ७.२0 रुपये प्रतिकिलो दराने १0 किलो गहू व ९.६0 रुपये प्रतिकिलो दराने पाच किलो तांदूळ असे एकूण १५ किलो धान्य देण्याची योजना सुरू केली होती. स्वस्त दरात मिळणार्‍या या धान्यामुळे एका कुटुंबाचा महिनाभराचा धान्यावरील खर्च कमी होऊन इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तोच पैसा कामी येत होता. शासनाच्या या निर्णयामुळे आता केशरी कार्डधारक कुटुंबांचा आर्थिक ताण वाढणार आहे.