शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाख केशरी कार्डधारकांना फटका

By admin | Updated: July 22, 2015 23:37 IST

अन्न सुरक्षा योजनेतील गरिबांचे धान्य केले बंद; जिल्ह्यातील २ लाखावर केशरी कार्डधारकांना फटका.

बुलडाणा : अन्न सुरक्षा योजनेत समावेश न करण्यात आलेल्या राज्यातील तब्बल पावणेदोन कोटी केशरी कार्डधारक गरीब नागरिकांचे रेशनचे धान्य राज्य सरकारने बंद केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार केशरी कार्डधारकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून केशरी कार्डधारक नागरिकांना रेशन दुकानातून माफक दरात गहू, तांदूळ मिळालेले नाही. एकीकडे महागाई व साठेबाजीमुळे धान्याचे भाव वाढत आहेत. आता नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. असे असताना राज्य सरकारने आपल्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी गरिबांचे धान्य बंद करून त्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न केला आहे. बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्येत २८ लाख एवढी असताना यापैकी १५ लाख ४0 हजार नागरिक अन्न सुरक्षा योजनेत सहभागी करण्यात आले होते. या नागरिकांना दोन रुपये किलो प्रमाणे गहू व तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ दिला जातो तसेच स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणारे जिल्ह्यात २ लाख ६६ हजार ९२८ हे एपीएल म्हणजे केशरी कार्डधारक आहेत. या केशरी कार्डधारक (एपीएल) नागरिकांनाही स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने गहू व तांदूळ असे एकूण १५ किलो धान्य देण्याची योजना सुरू केली होती; मात्र यामुळे शासकीय तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याचे कारण पुढे करून केशरी कार्डधारकांना मिळणारे रेशनचे धान्य बंद करण्यात आले आहे. गत काही महिन्यांपासून केशरकार्डधारकांना धान्यवाटप बंद आहे. शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयाबाबत अद्यापही आदेश प्राप्त झालेला नाही. पुरवठा विभागाकडून आदेश प्राप्त होताच त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी पी. के. सुरडकर यांनी स्पष्ट केले. आर्थिक ताण वाढणार शासकीय त्रुटींमुळे अनेक नागरिकांचा बीपीएलमध्ये व अन्न सुरक्षा योजनेत समावेश होऊ शकलेला नाही, अशा केशरी कार्डधारक (एपीएल) नागरिकांनाही स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने ७.२0 रुपये प्रतिकिलो दराने १0 किलो गहू व ९.६0 रुपये प्रतिकिलो दराने पाच किलो तांदूळ असे एकूण १५ किलो धान्य देण्याची योजना सुरू केली होती. स्वस्त दरात मिळणार्‍या या धान्यामुळे एका कुटुंबाचा महिनाभराचा धान्यावरील खर्च कमी होऊन इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तोच पैसा कामी येत होता. शासनाच्या या निर्णयामुळे आता केशरी कार्डधारक कुटुंबांचा आर्थिक ताण वाढणार आहे.