शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरी अडकल्या तांत्रिक अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:41 IST

बुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेतील जवळपास ९५२ विहिरी या तांत्रिक अडचणीत अडकल्या असून, त्या आता पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ हजार ९00 पैकी १३ हजार ५४७ विहिरी पूर्णत्वास गेल्याने शेतकर्‍यांना शाश्‍वत सिंचनाचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देमुदतवाढीचा पाठवला प्रस्ताव जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेतील जवळपास ९५२ विहिरी या तांत्रिक अडचणीत अडकल्या असून, त्या आता पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ हजार ९00 पैकी १३ हजार ५४७ विहिरी पूर्णत्वास गेल्याने शेतकर्‍यांना शाश्‍वत सिंचनाचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात २0१0 मध्ये १६ हजार ९00 विहिरी करण्यास धडक सिंचन योजनेंतर्गत मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी जवळपास तीन हजार विहिरींची कामे रखडलेली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव २0१५ मध्ये पाठविण्यात आला होता. यापैकी एक हजार ६६७ विहिरी पुर्णत्वास गेल्या आहेत, तर वर्तमानात रखडलेल्या सुमारे ३00 विहिरींसाठी नव्याने मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी जवळपास ४२ कोटी सात लाख ९३ हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. ७२ कोटी ९७ लाख ५0 हजार रुपयांचा निधी बुलडाणा जिल्ह्यास या कामासाठी मिळाला होता.

९५२ विहिरी ठरताहेत डोकेदुखीधडक सिंचन योजनेंतर्गत ९५२ विहिरी प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतजमिनीत या विहिरी घेण्यात येणार होत्या, त्या जमिनीच संबंधितानी विकल्याच्या किंवा तांत्रिकदृष्ट्या तेथे विहीर घेणे शक्य नसणे तर विहीर बांधण्याचा मानसच संबंधित लाभार्थ्यांनी बदलल्यामुळे जिल्हा परिषद सिंचन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत या विहिरी येत असल्या तरी त्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे आहे. 

३00 विहिरींचा प्रश्न मार्गी लागणार!गेल्या सात वर्षांपासून धडक सिंचन विहीर योजना जिल्ह्यात सुरू आहे. २0१५ मध्ये नव्याने मुदतवाढ घेत दोन हजार ९१९ विहिरींची कामे सुरू करण्यात आली होती. त्यापैकी वर्तमान स्थितीत ३00 विहिरींची कामे बाकी असल्याने त्यांच्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. 

सिंचन अनुशेष मोठाबुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा असल्याने धडक सिंचन विहिरींतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातच सिंचनाचा एक शाश्‍वत मार्ग उपलब्ध होत असल्याने या योजनेवर राज्य शासनाने जोर दिला होता. बुलडाणा जिल्ह्याच दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे.  एकटा जिगाव प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास बुलडाणा जिल्ह्याचा नव्हे तर अमरावती विभागाचा सिंचन अनुशेष दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच झाल्यास महत्तम ३१ सिंचन क्षेत्राच्या आसपास जिल्हा पोहोचेल; मात्र प्रदीर्घ कालावधीपासून या प्रकल्पाचेही काम रखडलेले आहे. त्यामुळे या सिंचन विहिरी शेतकर्‍यांसाठी मोठा आधार ठरणार्‍या आहेत.