शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सिंचन विहिरी अडकल्या तांत्रिक अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:41 IST

बुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेतील जवळपास ९५२ विहिरी या तांत्रिक अडचणीत अडकल्या असून, त्या आता पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ हजार ९00 पैकी १३ हजार ५४७ विहिरी पूर्णत्वास गेल्याने शेतकर्‍यांना शाश्‍वत सिंचनाचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देमुदतवाढीचा पाठवला प्रस्ताव जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेतील जवळपास ९५२ विहिरी या तांत्रिक अडचणीत अडकल्या असून, त्या आता पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ हजार ९00 पैकी १३ हजार ५४७ विहिरी पूर्णत्वास गेल्याने शेतकर्‍यांना शाश्‍वत सिंचनाचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात २0१0 मध्ये १६ हजार ९00 विहिरी करण्यास धडक सिंचन योजनेंतर्गत मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी जवळपास तीन हजार विहिरींची कामे रखडलेली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव २0१५ मध्ये पाठविण्यात आला होता. यापैकी एक हजार ६६७ विहिरी पुर्णत्वास गेल्या आहेत, तर वर्तमानात रखडलेल्या सुमारे ३00 विहिरींसाठी नव्याने मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी जवळपास ४२ कोटी सात लाख ९३ हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. ७२ कोटी ९७ लाख ५0 हजार रुपयांचा निधी बुलडाणा जिल्ह्यास या कामासाठी मिळाला होता.

९५२ विहिरी ठरताहेत डोकेदुखीधडक सिंचन योजनेंतर्गत ९५२ विहिरी प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतजमिनीत या विहिरी घेण्यात येणार होत्या, त्या जमिनीच संबंधितानी विकल्याच्या किंवा तांत्रिकदृष्ट्या तेथे विहीर घेणे शक्य नसणे तर विहीर बांधण्याचा मानसच संबंधित लाभार्थ्यांनी बदलल्यामुळे जिल्हा परिषद सिंचन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत या विहिरी येत असल्या तरी त्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे आहे. 

३00 विहिरींचा प्रश्न मार्गी लागणार!गेल्या सात वर्षांपासून धडक सिंचन विहीर योजना जिल्ह्यात सुरू आहे. २0१५ मध्ये नव्याने मुदतवाढ घेत दोन हजार ९१९ विहिरींची कामे सुरू करण्यात आली होती. त्यापैकी वर्तमान स्थितीत ३00 विहिरींची कामे बाकी असल्याने त्यांच्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. 

सिंचन अनुशेष मोठाबुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा असल्याने धडक सिंचन विहिरींतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातच सिंचनाचा एक शाश्‍वत मार्ग उपलब्ध होत असल्याने या योजनेवर राज्य शासनाने जोर दिला होता. बुलडाणा जिल्ह्याच दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे.  एकटा जिगाव प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास बुलडाणा जिल्ह्याचा नव्हे तर अमरावती विभागाचा सिंचन अनुशेष दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच झाल्यास महत्तम ३१ सिंचन क्षेत्राच्या आसपास जिल्हा पोहोचेल; मात्र प्रदीर्घ कालावधीपासून या प्रकल्पाचेही काम रखडलेले आहे. त्यामुळे या सिंचन विहिरी शेतकर्‍यांसाठी मोठा आधार ठरणार्‍या आहेत.