शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सिंचन विहिरी अडकल्या तांत्रिक अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:41 IST

बुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेतील जवळपास ९५२ विहिरी या तांत्रिक अडचणीत अडकल्या असून, त्या आता पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ हजार ९00 पैकी १३ हजार ५४७ विहिरी पूर्णत्वास गेल्याने शेतकर्‍यांना शाश्‍वत सिंचनाचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देमुदतवाढीचा पाठवला प्रस्ताव जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेतील जवळपास ९५२ विहिरी या तांत्रिक अडचणीत अडकल्या असून, त्या आता पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ हजार ९00 पैकी १३ हजार ५४७ विहिरी पूर्णत्वास गेल्याने शेतकर्‍यांना शाश्‍वत सिंचनाचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात २0१0 मध्ये १६ हजार ९00 विहिरी करण्यास धडक सिंचन योजनेंतर्गत मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी जवळपास तीन हजार विहिरींची कामे रखडलेली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव २0१५ मध्ये पाठविण्यात आला होता. यापैकी एक हजार ६६७ विहिरी पुर्णत्वास गेल्या आहेत, तर वर्तमानात रखडलेल्या सुमारे ३00 विहिरींसाठी नव्याने मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी जवळपास ४२ कोटी सात लाख ९३ हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. ७२ कोटी ९७ लाख ५0 हजार रुपयांचा निधी बुलडाणा जिल्ह्यास या कामासाठी मिळाला होता.

९५२ विहिरी ठरताहेत डोकेदुखीधडक सिंचन योजनेंतर्गत ९५२ विहिरी प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतजमिनीत या विहिरी घेण्यात येणार होत्या, त्या जमिनीच संबंधितानी विकल्याच्या किंवा तांत्रिकदृष्ट्या तेथे विहीर घेणे शक्य नसणे तर विहीर बांधण्याचा मानसच संबंधित लाभार्थ्यांनी बदलल्यामुळे जिल्हा परिषद सिंचन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत या विहिरी येत असल्या तरी त्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे आहे. 

३00 विहिरींचा प्रश्न मार्गी लागणार!गेल्या सात वर्षांपासून धडक सिंचन विहीर योजना जिल्ह्यात सुरू आहे. २0१५ मध्ये नव्याने मुदतवाढ घेत दोन हजार ९१९ विहिरींची कामे सुरू करण्यात आली होती. त्यापैकी वर्तमान स्थितीत ३00 विहिरींची कामे बाकी असल्याने त्यांच्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. 

सिंचन अनुशेष मोठाबुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा असल्याने धडक सिंचन विहिरींतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातच सिंचनाचा एक शाश्‍वत मार्ग उपलब्ध होत असल्याने या योजनेवर राज्य शासनाने जोर दिला होता. बुलडाणा जिल्ह्याच दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे.  एकटा जिगाव प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास बुलडाणा जिल्ह्याचा नव्हे तर अमरावती विभागाचा सिंचन अनुशेष दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच झाल्यास महत्तम ३१ सिंचन क्षेत्राच्या आसपास जिल्हा पोहोचेल; मात्र प्रदीर्घ कालावधीपासून या प्रकल्पाचेही काम रखडलेले आहे. त्यामुळे या सिंचन विहिरी शेतकर्‍यांसाठी मोठा आधार ठरणार्‍या आहेत.