शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचीत !

By admin | Updated: December 22, 2014 23:44 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : शाळा व्यवस्थापनच लाटते पैसा.

बुलडाणा :सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेपासून मागील तीन वर्षापासून अकोला, बुलडाणा अणि वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थी वंचीत आहेत. विशेष म्हणजे अनेक शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांच्या या शिष्यवृत्तीचा पैसा दुसरीकडेच वापरला आहे. राज्यातील अनुदानित, विना अनुदानित, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंंत शिक्षण घेणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांना राज्य शासन शिष्यवृत्ती देते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर खर्च भागविता यावा यासाठी ही सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती शासनाने २0१0-११ पासून सुरू केलेली आहे. प्रत्येक वर्षी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांंना तीन टप्प्यात ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय संबंधित मुख्याध्यापकांच्या नावे धनादेश पाठवितात. मुख्यध्यापकांनी आलेला धनादेश वटवून या शिष्यवृत्तीचे वाटप विद्यार्थ्यांंना करावे असा नियम आहे. मात्र खासगी शाळातील व्यवस्थापनाचे पदाधिकारी सदर धनादेश परस्पर आपल्या खात्यात जमा करुन पैसे वापरतात. विशेष म्हणजे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांंना आपल्याला अशा प्रकारची शिष्यवृत्ती मिळते याची माहितीही नसते. माहिती असली तरी खासगी शाळेतील मुख्यध्यापक अथवा व्यवस्थापनाला विचारण्याची कोणाची हिंमतही होत नाही. आता प्रत्येक विद्यार्थ्यांंचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे आवश्यक झाले आहे.