शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आदिवासी प्रकल्प कार्यालयाने घेतला बळी; मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:12 IST

दोषी नसतानाही आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मनमानी कारभाराने शे.सलीम शे.मुनाफ यांचा बळी घेतला असल्याचा आरोप गत ७ डिसेंबर रोजी हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या शे.सलीम शे.मुनाफ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : खामगाव तालुक्यातील पाळा येथील निंबाजी कोकरे अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील अत्याचार प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर या शाळेची मान्यता रद्द करून १८ आरोपींवर दोषारोपपत्र दाखल होऊन न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दोषी नसतानाही आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मनमानी कारभाराने शे.सलीम शे.मुनाफ यांचा बळी घेतला असल्याचा आरोप गत ७ डिसेंबर रोजी हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या शे.सलीम शे.मुनाफ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.याबाबत मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सदर शाळेवरील २५ शालेय कर्मचार्‍यांपैकी नऊ जणांवर फौजदारी कारवाई होऊन त्यांचे निलंबन झाले आहे. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच उर्वरित १६ शालेय कर्मचार्‍यांचे इतरत्र समायोजनाचे आदेश असतानाही याबाबत अद्यापही कारवाई  झालेली नाही, तसेच सदर कर्मचार्‍यांना शासन निर्णयानुसार निलंबन काळात देय असलेला निर्वाह भत्तादेखील अद्यापही सुरू करण्यात आलेला नाही, त्यामुळे गेल्या वर्षभरापासून उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. अशातच मृत शेख सलीम यांचा आरोपींमध्ये समावेश नसतानासुद्धा व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई झालेली नसताना त्यांना ४ नोव्हेंबर २0११ रोजी अदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आदिवासी विकास आयुक्त नाशिक हे शाळेला भेट देण्यास आले असता, शे.सलीम यांच्यावर शाळेत अनुपस्थित राहून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यासह दोन शिक्षक व एक स्वयंपाकी यांना निलंबित करण्यात आले. वस्तुत: भेटीच्या दिवशी शे.सलीम तेथे उपस्थित असल्याचे व्हिडिओ चित्रीकरणात असल्याबाबतचा पुरावा सादर करूनही अन्यायकारक पद्धतीने निलंबित करण्यासोबतच निलंबनानंतर कोणत्याही प्रकारची चौकशीसुद्धा केलेली नाही, तसेच निलंबन काळात देय असलेला निर्वाह भत्तादेखील सुरू केलेला नाही. दरम्यान, मृत शे.सलीम यांनी मृत्यूपूर्वी याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला असता, याकडे दुर्लक्ष झाल्याशिवाय निलंबन काळात प्रकल्प कार्यालय अकोला येथे मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश असल्याने बिकट आर्थिक परिस्थितीत व या प्रकरणात काही संबंध नसताना सोसावा लागणारा मन:स्ताप सहन न झाल्याने ७ डिसेंबर २0१७ रोजी त्यांच्या राहते गावी सवणा येथे हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, दोन मुले व पत्नी असा परिवार असून, या घटनेनंतर मृताची पत्नी शाहीन परवीन व कुटुंबीयांनी याबाबत दाद मागण्यासाठी अकोला येथे आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे गेले असता, हा प्रकार अंगलट येण्याच्या भीतीने सदर कार्यालयाने आमच्यावरच खोट्या तक्रारी दाखल केल्या असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला असून, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दोष नसताना मृत्यू पावलेल्या शे.सलीम यांना व इतर तीन कर्मचार्‍यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी कयुम शहा व मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे. 

टॅग्स :chikhali roadचिखली रोडbuldhanaबुलडाणा