शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

त्रिकोणी लढतीची चिन्हं, विकासाच्या मुद्यांना बगल!

By admin | Updated: June 12, 2014 20:52 IST

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंजक ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.

जळगाव : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी त्रिकोणी लढतीची शक्यता असल्याने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंजक ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे प्रतापराव जाधव यांना जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात जवळपास २६ हजाराचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे या मतदारसंघात भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचे मानले जाते. आपल्या कार्यकाळात पाणीपुरवठा योजनेसारखी केलेली कामं घेऊन, ते निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी करीत असताना, इतर पक्षांमध्ये मात्र उमेदवारीसाठीच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ऐनवेळी उमेदवारी जाहीर करणे, ही काँग्रेसची प्रथाच असून, त्यामुळे उमेदवाराचे आणि पर्यायाने पक्षाचेही नुकसान होते. यावेळीही काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची यादी मोठी आहे. कुणालाही उमेदवारी जाहीर झाली की, अन्य नेते काँग्रेसचे अन्य इच्छुक उमेदवार जीव ओतून काम करीत नाहीत. सध्या रामविजय बुरुंगले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, अंजलीताई टापरे, डॉ. एस.के.दलाल, जिल्हा परिषद सदस्य सौ. ज्योतीताई टापरे, संजय उमरकर हे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी शर्यतीत आहे. २00९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रामविजय बुरुंगले हे तिसर्‍या क्रमांकावर होते. त्यांना ४३ हजार २२0 मते मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या विरोधात छुप्या पद्धतीने काम केले होते. याशिवाय बुंरुगले यांचे नाव जळगाव व संग्रामपूर तालुक्यासाठी नवीन होते. यावेळी तशी परिस्थिती राहणार नाही, हे खरे; मात्र त्यांना उमेदवारी मिळते की नाही, हे मात्र निश्‍चित नाही. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे महत्वाचे राहणार आहे. गत निवडणुकीत भारिप-बमसंचे प्रसेनजीत पाटील यांनी दुसर्‍या क्रमांकाची, ४५ हजार १७७ मतं मिळवून पक्षाला उभारी दिली होती. केवळ चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यांना उमेदवारी मिळाली तर निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनसेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनीही रणशिंग फुंकले आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, तर ती भाजपसाठी अडचणीची राहणार आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर जळगाव जामोद काँग्रेसकडे आहे. जागा वाटपादरम्यान जळगाव जामोद मतदारसंघ स्वत:कडे घेण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असले, तरी प्रत्यक्षात तसे होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या पक्षाच्या इच्छुक उमेदवार डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर यांना प्रतिक्षाच करावी लागण्याची शक्यता आहे.या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत जातीय समीकरणांचाच प्रभाव राहीला आहे. २00४ च्या निवडणुकीत पाटील समाजाचा प्रभावी उमेदवार नसल्याने, या समाजाने भाजपचे डॉ.कुटे यांना यांच्या विजयासाठी हातभार लावला. २00९ च्या निवडणुकीत माळी समाजाचा सशक्त उमेदवार नसल्याने, या समाजानेही भाजपलाच पाठिंबा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही समाजाचे नेमके कोणते उमेदवार मैदानात उतरतात, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. माजी आ. स्व. तुळशिरामजी ढोकणे यांचे पुत्र प्रकाश ढोकणे यांची भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची इच्छा आहे; मात्र भाजपकडून त्यांना सध्यातरी फारसा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत नाही. प्रत्येक निवडणुकीत विकासाच्या मुद्दे बाजुला पडल्याचे चित्र पहावयास मिळते. यंदाची निवडणूकही विकासाच्या मुद्यावर होते की, पुन्हा जातीय समिकरणंच प्रभावी ठरतात, यावरही बरंच काही अवलंबून राहणार आहे.