शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

शहरांमध्ये वृक्ष तोडल्यास दंड, भरपाईत होणार वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 10:47 IST

Tree felling in cities will be penalized : वृक्षांची भरपाई करण्यासाठी ठरवून दिलेल्या संख्येत वृक्षारोपण करून त्याचे ७ वर्ष संगोपन करावे लागणार आहे. 

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : यापुढे शहरी भागातील कोणत्याही तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या वयानुसार त्या वृक्षांची भरपाई करण्यासाठी ठरवून दिलेल्या संख्येत वृक्षारोपण करून त्याचे ७ वर्ष संगोपन करावे लागणार आहे. राज्यातील शहरांमध्ये या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना शहरी वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने `महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमात विविध सुधारणा केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी ६ ऑगस्टपासून करण्याचा आदेश देण्यात आला आहे.शहरी भागातील झाडांचे संरक्षण व जतन करण्यासाठी हा अधिनियम १९७५ मध्येच अस्तित्वात आला. त्यामध्ये आता ६ आँगस्ट रोजी सुधारणा करण्यात आली. त्यानुसार पुरातन वृक्ष ठरवणे, वृक्षांचे वय, भरपाई वृक्षारोपण या बाबी स्पष्ट करण्यात आल्या. तसेच एक किंवा दोनशेपेक्षा अधिक वृक्षतोड होत असल्यास त्यासाठी परवानगी देणारी यंत्रणाही ठरवून देण्यात आली आहे.कोणत्याही प्रजातीचा वृक्ष ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचा असेल तर त्याला पुरातन (हेरिटेज) ठरवले जाणार आहे. वृक्षांचे वय निश्चित करण्याची पद्धतही ठरवून देण्यात आली आहे. पुरातन वृक्ष तोडावयाचे असल्यास त्याची भरपाई म्हणून वृक्षांची संख्याही ठरवून दिली आहे. त्यानुसार तोडल्या जाणाऱ््या वृक्षांच्या वयाइतके वृक्ष लावावे लागणार आहेत. तसेच त्या वृक्षांची लागवड करताना किमान सहा फूट उंचीच्या रोपांची अट आहे. त्या वृक्षांचे रोपण केल्यानंतर सात वर्ष संगोपन करावे लागणार आहे. या कालावधीत वृक्ष न जगल्यास तितक्याच संख्येने पुन्हा वृक्षलागवड करावी लागणार आहे. वृक्ष तोडणारांना लागवड आणि संगोपन करणे शक्य नसल्यास वृक्षांच्या मूल्यांकनाची रक्कम जमा करावी लागणार आहे.

शहरांमध्ये वृक्ष प्राधिकरणया अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक वृक्ष प्राधिकरणाची रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी आहे. तर वृक्ष तज्ञांचा त्यामध्ये समावेश असेल.

मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीला परवानगीपाच वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची २०० पेक्षा अधिक वृक्ष तोडावयाचे असल्यास त्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे मंजूरीसाठी पाठवावा लागणार आहे.

दर पाच वर्षांनी गणनास्थानिक प्राधिकरणाने दर पाच वर्षांनी वृक्षांची गणना करावी, त्यापैकी पुरातन वृक्षांचे वर्गिकरण करणे, संवर्धन करणे, स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड करणे, नागरी कार्यक्षेत्रातील सर्व भूमिवरील वृक्षांचे अस्तित्व निश्चित करणे, शहरातील किमान ३३ टक्के क्षेत्रावर वृक्षारोपण करणे, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

वृक्ष तोडल्यास एक लाखापर्यंत दंडविनापरवानगी वृक्ष तोडल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे. ती रक्कम वेळोवेळी तरतुदीनुसार वसुल केली जाईल. त्यापोटी एक लाख रूपयापर्यंतचा दंडही होऊ शकतो.

टॅग्स :khamgaonखामगावenvironmentपर्यावरणforest departmentवनविभाग