शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

बुलडाणा शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 15:31 IST

शहरातील जवळपास सर्वच चौकांमध्ये अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. योग्य नियोजनाअभावी अनेकवेळा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यामुळे वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.येथे दररोज जिल्हाभरातील नागरिकांची कामानिमित्त वर्दळ असते. त्यामुळे सहाजिकच रस्त्यावर वाहनांची गर्दी निर्माण होते. शहरातील जवळपास सर्वच चौकांमध्ये अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. किरकोळ अपघाताचे प्रकारही अनेवेळा घडलेले आहेत. शहरातील जांभरूण रोडवर सर्वात जास्त वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र दररोज निर्माण होते. मोठ्या प्रमाणात होणारी बेशिस्त पार्किंग व वाढते अतिक्रमण या परिस्थितीला कारणीभूत आहे. या रस्त्यावर दवाखान्यांची संख्या जास्त असल्यामुळे सर्वात जास्त रुग्णांसह त्यांचे नातेवाईक या रस्त्याने ये-जा करतात. परंतु दिवसातून किमान तीन ते चार वेळा या मार्गावर स्ट्राफीक जाम झाल्याचे पाहायला मिळते. या परिस्थितीमुळे अनेकवेळा संगम चौकापासून दवाखाना व इतर नियोजित ठिकाणी पोहचायला जवळपास २० मिनिटे ते त्यापेक्षाही जास्त वेळ लागत असल्याचा अनुभव येतो. शहरातील वाहतुक व्यवस्थेवर पोलिसांचे योग्य नियंत्रण नसल्याने असे प्रकार सातत्याने घडतात. अपघात टाळण्यासाठी व वाहनधारकांचा त्रास कमी करण्यासाठी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी वाहतुक पोलिसांनी प्रत्येक चौकात प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यास यामध्ये सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. सर्वात जास्त वर्दळ असणाऱ्या संगम चौक, जयस्तंभ चौक व स्टेट बँक चौकात वाहतूकीची कोंडी असते.  

आठवडी बाजारात पार्किंगचा प्रश्नआठवडी बाजारात येणाºया नागरिकांना आपले वाहन पार्किंग करण्यासाठी योग्य जागाच नसल्याने खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा अर्ध्या रस्त्यावर वाहने उभी करावी लागत असल्याने आठवडी बाजार परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. येथील पार्किंग व्यवस्थेचे पद्धतशीरपणे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. वाहतुक पोलिसांनी याबाबत कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

सिग्नलव्यवस्था ठरतेय शाभेची वस्तू४नगरपालिकेच्या वतीने शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी मुख्य चौकांमध्ये सिग्नलची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, त्रिशरण चौक, कारंजा चौक व तहसील चौकाचा समावेश आहे. मात्र ही सिग्नलव्यवस्था कार्यान्वितच झाली नसल्याने त्याचा वाहतुक सुरळीत करण्याच्या दृष्टीने कोणताही उपयोग होता दिसून येत नाही. परिणामी ही संपूर्ण सिग्नल व्यवस्था सद्य:स्थितीत केवळ शोभेची वस्तू ठरत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTrafficवाहतूक कोंडी