शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन गरजेचे - विजय पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:22 IST

अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी  ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.

- राजू चिमणकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजातील गरजू, होतकरू, अनाथांना आधार देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. याच भावनेतून पूर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरांना फाटा देत, त्या खर्चातून गरजू, होतकरू, अनाथांच्या चेहºयावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी  ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.  

आत्मसन्मान फाउंडेशनच्या वाटचालीबद्दल काय सांगाल? राज्यातील ग्रामीण भागामध्ये लहान मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतल्या जात असताना त्यांच्या हाताला काम नव्हे तर त्यांच्या हाती पाटी देण्यासाठी आत्मसन्मान जागृत झाला. त्यानंतर सन २०११  पासून शिक्षण सहायता उपक्रमाने मुहूर्तमेढ रोवल्या गेली. पुढे संगणक साक्षरता अभियान, व्यसनमुक्त तरुण  अभियानालाही सुरुवात झाली.  व्यसनमुक्ती कार्याबाबत काय सांगाल?  तरुणाईला विविध व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. युवा पिढीमध्ये नवा विचार पेरण्यासाठी त्यांना वास्तविकतेची जाणिव करून देण्यात येत आहे. व्यसनाचा पैसा  वाचवून तो आपण समाजाच्या सत्कार्यासाठी देऊ शकतो, ही  भावना त्यांच्यात निर्माण होणे गरजेचे आहे. सध्या मुक्ताईनगर रोडवर व्यसनमुक्ती केंद्राचे बांधकाम सुरू आहे. येथे कार्यशाळा, शिबिराच्या माध्यमातून युवकांचे मन परिवर्तन करणे सुरू  आहे.   युवा पिढीला काय संदेश द्याल? इंटरनेटच्या जाळ््यात अडकलेल्या तरुणाईने समाजातील वास्तव जाणून घ्यावे. आपल्या वाढदिवसानिमित्त का होईना एक दिवस गरजू, निराधारांसोबत घालवावा. त्या जाणिव जागृतीमधून समाजात आदर्श नागरिक घडून, त्यांचे राष्टÑनिर्मितीमध्ये योगदान राहू शकते. समाजाला नवी दिशा देण्यासाठी तरुणांनी साध्या पद्धतीने लग्न करून विधायक कार्यासाठी पुढाकार घ्यावा.    

 राज्यभरात उपक्रम, व्यापक प्रतिसाद  शेतकरी कन्या, पुत्र अभ्यासिका सुरू करण्यात आली. यामध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. मनोरुग्णांना आधार मिळावा, यासाठी मन परिवर्तन समुपदेशन केंद्रही  सुरू करण्यात आले आहे. सर्वच समाजाचा विविध उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाजाची देण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे संस्थेचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बिड, नांदेड, विदर्भातील बुलडाणा, मोताळा, मलकापूर, जळगाव, बुलडाणा तसेच बोरीवली, मुंबई येथेही व्यापक प्रमाणात आत्मसन्मानाची चळवळ रुजली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत