शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन गरजेचे - विजय पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:22 IST

अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी  ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.

- राजू चिमणकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजातील गरजू, होतकरू, अनाथांना आधार देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. याच भावनेतून पूर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरांना फाटा देत, त्या खर्चातून गरजू, होतकरू, अनाथांच्या चेहºयावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी  ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.  

आत्मसन्मान फाउंडेशनच्या वाटचालीबद्दल काय सांगाल? राज्यातील ग्रामीण भागामध्ये लहान मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतल्या जात असताना त्यांच्या हाताला काम नव्हे तर त्यांच्या हाती पाटी देण्यासाठी आत्मसन्मान जागृत झाला. त्यानंतर सन २०११  पासून शिक्षण सहायता उपक्रमाने मुहूर्तमेढ रोवल्या गेली. पुढे संगणक साक्षरता अभियान, व्यसनमुक्त तरुण  अभियानालाही सुरुवात झाली.  व्यसनमुक्ती कार्याबाबत काय सांगाल?  तरुणाईला विविध व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. युवा पिढीमध्ये नवा विचार पेरण्यासाठी त्यांना वास्तविकतेची जाणिव करून देण्यात येत आहे. व्यसनाचा पैसा  वाचवून तो आपण समाजाच्या सत्कार्यासाठी देऊ शकतो, ही  भावना त्यांच्यात निर्माण होणे गरजेचे आहे. सध्या मुक्ताईनगर रोडवर व्यसनमुक्ती केंद्राचे बांधकाम सुरू आहे. येथे कार्यशाळा, शिबिराच्या माध्यमातून युवकांचे मन परिवर्तन करणे सुरू  आहे.   युवा पिढीला काय संदेश द्याल? इंटरनेटच्या जाळ््यात अडकलेल्या तरुणाईने समाजातील वास्तव जाणून घ्यावे. आपल्या वाढदिवसानिमित्त का होईना एक दिवस गरजू, निराधारांसोबत घालवावा. त्या जाणिव जागृतीमधून समाजात आदर्श नागरिक घडून, त्यांचे राष्टÑनिर्मितीमध्ये योगदान राहू शकते. समाजाला नवी दिशा देण्यासाठी तरुणांनी साध्या पद्धतीने लग्न करून विधायक कार्यासाठी पुढाकार घ्यावा.    

 राज्यभरात उपक्रम, व्यापक प्रतिसाद  शेतकरी कन्या, पुत्र अभ्यासिका सुरू करण्यात आली. यामध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. मनोरुग्णांना आधार मिळावा, यासाठी मन परिवर्तन समुपदेशन केंद्रही  सुरू करण्यात आले आहे. सर्वच समाजाचा विविध उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाजाची देण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे संस्थेचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बिड, नांदेड, विदर्भातील बुलडाणा, मोताळा, मलकापूर, जळगाव, बुलडाणा तसेच बोरीवली, मुंबई येथेही व्यापक प्रमाणात आत्मसन्मानाची चळवळ रुजली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत