मेहकर (बुलडाणा) : मेहकर, सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील शेतकरी सद्य:स्थितीत रब्बी हंगामा तील पिकांना वाचविण्यासाठी कृषी पंपाच्या साहाय्याने पिकांना पाणी देत आहेत; परंतु वारंवार खंडित होणारा शेतातील विद्युत पुरवठा शेतकर्यांच्या मुळावर उठला आहे. विद्युत पुरवठा सुरळीत राहत नसल्याने रब्बी पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात असून, शेतकरी हैराण झाले आहेत.पावसाच्या हुलकावणीमुळे परिसरातील शेतकर्यांचा खरीप हंगाम हातचा निघून गेला. त्यामुळे खरिपातील कसर रब्बीत भरून काढण्याच्या तयारीत शेतकर्यांनी रब्बी पेरणी केली; परंतु ज्या शेतकर्यांकडे ओलि ताची सोय आहे, त्यांनीच गहू, हरभरा आदी पिकांचा पेरा केला. गहू, हरभरा शेतात डोलत असतानाच त्याला पाणी देणे गरजेचे झाले आहे. तर तूर पिकही शेंगा पक्वतेच्या अवस्थेत असून, तूर पिकालाही पाण्याची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठी शेतकरी कृषी पंपाच्या साहाय्याने रब्बी पिकाला रात्रंदिवस पाणी देत आहेत; परंतु शेतातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकाला पाणी देणे अवघड झाले आहे. वेळीच पिकाला पाणी मिळाले नाही, तर ही पिके सुकण्याच्या वाटेवर आहेत. विद्युत सुरळीत राहत नसल्याने रब्बीला पाणीही मिळत नाही. त्यामुळे रब्बी हंगाम महावितरणच्या दुर्लक्षामुळे धोक्यात सापडत आहे. तर शेतातील विद्युत रोहित्र बिघडल्यास वीज वितरणचे कर्मचारीही कित्येक दिवस फिरकून पाहत नसल्याने शेतकर्यांना वीज वितरण कार्यालयाच्या पायर्या झिजवाव्या लागत आहेत. याकडे लक्ष देऊन शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, अशी मागणी शे तकर्यांमधून होत आहे.
खंडित विद्युत पुरवठा शेतक-यांच्या मुळावर !
By admin | Updated: December 22, 2014 00:45 IST