शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

खंडित विद्युत पुरवठा शेतक-यांच्या मुळावर !

By admin | Updated: December 22, 2014 00:45 IST

शेतकरी हैराण : रब्बी हंगाम धोक्यात.

मेहकर (बुलडाणा) : मेहकर, सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील शेतकरी सद्य:स्थितीत रब्बी हंगामा तील पिकांना वाचविण्यासाठी कृषी पंपाच्या साहाय्याने पिकांना पाणी देत आहेत; परंतु वारंवार खंडित होणारा शेतातील विद्युत पुरवठा शेतकर्‍यांच्या मुळावर उठला आहे. विद्युत पुरवठा सुरळीत राहत नसल्याने रब्बी पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात असून, शेतकरी हैराण झाले आहेत.पावसाच्या हुलकावणीमुळे परिसरातील शेतकर्‍यांचा खरीप हंगाम हातचा निघून गेला. त्यामुळे खरिपातील कसर रब्बीत भरून काढण्याच्या तयारीत शेतकर्‍यांनी रब्बी पेरणी केली; परंतु ज्या शेतकर्‍यांकडे ओलि ताची सोय आहे, त्यांनीच गहू, हरभरा आदी पिकांचा पेरा केला. गहू, हरभरा शेतात डोलत असतानाच त्याला पाणी देणे गरजेचे झाले आहे. तर तूर पिकही शेंगा पक्वतेच्या अवस्थेत असून, तूर पिकालाही पाण्याची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठी शेतकरी कृषी पंपाच्या साहाय्याने रब्बी पिकाला रात्रंदिवस पाणी देत आहेत; परंतु शेतातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकाला पाणी देणे अवघड झाले आहे. वेळीच पिकाला पाणी मिळाले नाही, तर ही पिके सुकण्याच्या वाटेवर आहेत. विद्युत सुरळीत राहत नसल्याने रब्बीला पाणीही मिळत नाही. त्यामुळे रब्बी हंगाम महावितरणच्या दुर्लक्षामुळे धोक्यात सापडत आहे. तर शेतातील विद्युत रोहित्र बिघडल्यास वीज वितरणचे कर्मचारीही कित्येक दिवस फिरकून पाहत नसल्याने शेतकर्‍यांना वीज वितरण कार्यालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागत आहेत. याकडे लक्ष देऊन शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, अशी मागणी शे तकर्‍यांमधून होत आहे.