शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

खामगावातील ऐतिहासिक शांती महोत्सव खंडीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 10:21 IST

Khamgaon शांती महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती मोठी देवी शांती महोत्सव समितीचे अध्यक्ष उत्तमराव उमरकर यांनी दिली.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तब्बल एका शतकापेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेला शांती (जगदंबा, मोठी देवी) महोत्सव  कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने स्थगीत करण्यात आला आहे. त्यामुळे खामगावातील शांती,  भक्ती आणि शक्तीच्या उत्सवावर विरजण पडले आहे. तथापि, आता शासनाच्या परवानगीकडे खामगावातील भाविकांच्या नजरा लागून आहे.  संपूर्ण देशात केवळ खामगाव आणि परिसरात शांती महोत्सव साजरा होतो. कोजागिरी पोर्णिमेपासून पुढील ११ दिवस हा महोत्सव भक्तीभावाने पार पडतो. त्यामुळे या महोत्सवाची परिसरातील भाविकांना प्रतीक्षा असते.  देशाच्या कानाकोपºयातील भाविक येथे शांती महोत्सवात दर्शनासाठी आपल्या परिवारासह येतात.  मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे शांती महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती मोठी देवी शांती महोत्सव समितीचे अध्यक्ष उत्तमराव उमरकर यांनी दिली. असा आहे शांती महोत्सवाचा इतिहास  विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर, देवीचा चेहरा क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो. त्यामुळे  म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. तसेच देवीला शांत करण्याकरीता पूजा, अर्चना, आराधना केली जाते. त्या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते. जंगदबा उत्सव, मोठी देवी उत्सव केवळ खामगावातच साजरा होत असल्याने, या उत्सवाला वेगळे महत्व असून एक वेगळीच परंपरा हा उत्सव राखून आहे. श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने शहरातील जलालपुरा भागात अनेक वर्षापासून तर खामगाव शहरात सन १९०८ पासून  साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. मोठी देवीचा बोधन ते खामगाव प्रवासआंध्रप्रदेशात निजामाबाद जिल्ह्यात बोधन  गाव आहे.  महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याच्या  सिमेनंतर आंध्र प्रदेशच्या सिमेस प्रारंभ होतो व सिमेपासून काही अंतरावर हरीद्रा नदी वाहते. या नदीच्या काठी मातेचे पूर्वी स्थान होते. कालांतराने ते बोधन गावच्या मध्यभागी मातेचे जागृत स्थान स्थायीक झाले. तेथूनच देवी खामगावात आली.   कै.कैरन्ना आनंदे हे लोहगाव येथील रहिवासी होते. बिड्याच्या व्यवसायाकरीता लागणाºया पानाच्या व्यवहाराकरीता बोधन येथे त्यांचे येण-जाणे राहायचे. त्यामुळे ते बोधनच्या मातेचे भक्त झाले. लोहगाव येथे मातेच्या मुर्तीची स्थापना करून उत्सव साजरा करत. कालांतराने त्यांनी खामगाव शहरात येऊन व्यवसाय सुरू केला. त्यानंतर खामगावात त्यांनी आपल्या स्वत:च्या बिडी कारखान्यातील सर्व जातीधर्माच्या कामगारांच्या सहाय्याने हा उत्सव सुरू केला.  हीच प्रथा पुढे सुरू आहे. शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा!नवरात्रोत्सवाला काही विशिष्ट अटींवर परवानगी नाकारण्यात आल्यावर खामगाव येथील मोठी देवी शांती महोत्सव मंडळानेही मोठी देवीचा महोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव उमरकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे शांती महोत्सव तयार रद्द झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, या महोत्सवाला कोजागिरी पोर्णिमा म्हणजेच ३० तारखेपर्यंतचा अवधी आहे. त्यामुळे  शासनाच्या परवानगीची भाविकांना प्रतीक्षा असून ३० तारखेपर्यंत महोत्सवाला परवानगी मिळेल, अशी अनेकांना आशा आहे. 

 

टॅग्स :khamgaonखामगावIndian Traditionsभारतीय परंपराbuldhanaबुलडाणा